शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

टेंभुर्णीचा पाणीप्रश्न सोडविण्याचे आव्हान पेलवणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST

नाल्यांच्या साफसफाईसह अनेक समस्यांंचा करावा लागणार सामना टेंभुर्णी : टेंभुर्णीच्या इतिहासात प्रथमत: सरपंच व उपसरपंच पदावर महिला सदस्यांची निवड ...

नाल्यांच्या साफसफाईसह अनेक समस्यांंचा करावा लागणार सामना

टेंभुर्णी : टेंभुर्णीच्या इतिहासात प्रथमत: सरपंच व उपसरपंच पदावर महिला सदस्यांची निवड झाली आहे. दरम्यान, या दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांनी अद्याप आपल्या पदाचा पदभार स्वीकारला नाही. गेल्या अनेक वर्षांपासूनचा गावचा पाणीप्रश्न तसेच गावांतर्गत अनेक समस्या सोडविण्याचे मोठे आव्हान या दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांसमोर असल्याचे ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत.

टेंभुर्णीकरांना बाराही महिने नळाच्या पाण्यासाठी १५ ते २० दिवसांपर्यंत वाट पाहावी लागते. आज २१ दिवस उलटून गेले तरी गावातील अनेक झोनला अद्यापही नळाचे पाणी आलेले नाही. अनेक सरपंच आले आणि गेले. मात्र, टेंभुर्णीकरांचा पाणीप्रश्न होता तसाच आहे. गावच्या अगदी जवळ अकोलादेव येथे तालुक्यातील सर्वात मोठे जीवरेखा धरण असतानाही टेंभुर्णीकर नेहमी तहानलेलेच राहिलेले आहेत.

आज गावात पाणी साठविण्यासाठी असलेले तीन जलकुंभ गावच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पर्याप्त नाहीत. त्यातच गावांतर्गत जलवाहिनीला सगळीकडे गळती लागल्याने नळाला पाणी आल्यावर नळातून कमी पण रस्त्यावरच जास्त पाणी दिसते. त्यातच लोडशेडिंगमुळे पाणीपुरवठ्यासाठी पूर्णवेळ वीज मिळत नसल्याने त्याठिकाणी स्वतंत्र फीडरची आवश्यकता आहे.

याशिवाय गावातील नाल्यातही घाण साचल्याने अनेक भागात नाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसते, तर गावातील बसस्थानकासह कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने माणसांना लघुशंकेसाठी अडोसा शोधावा लागतो. यात महिला वर्गासाठीही कुठेही स्वच्छतागृह नसल्याने वर्षानुवर्षांपासून त्यांची मोठी कुचंबणा होत आहे. आता गावच्या महत्त्वाच्या दोन्ही पदांवर महिला पदाधिकारी असल्याने महिलांचे प्रश्न तरी प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी त्या पुढाकार घेणार काय, असा प्रश्नही जनता विचारीत आहे.

एकंदर सरपंच- उपसरपंचांची निवड झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्या गळ्यात टाकलेल्या हारांची फुले अद्याप सुकली नसली तरी त्याअगोदर गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्या या महिला पदाधिकारी सोडवतील, अशी आशा जनतेला लागली आहे.