शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

आरक्षणासाठी आणखी तरुणांच्या बळीची वाट पाहणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:32 IST

वडीगोद्री/ शहागड : मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्यासह आंदोलने करण्यात आली. यादरम्यान ४२ युवकांनी बलिदान दिले. तरी शासनाकडून अद्याप समाजाचे ...

वडीगोद्री/ शहागड : मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्यासह आंदोलने करण्यात आली. यादरम्यान ४२ युवकांनी बलिदान दिले. तरी शासनाकडून अद्याप समाजाचे प्रश्न मार्गी लावले जात नाहीत. बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. त्यामुळे शासन आणखी मराठा समाजातील युवकांच्या बळी जाण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षण मिळण्यासाठी बलिदान दिलेल्या ४२ शहिदांच्या कुटुंबीयांनी २० दिवसांपूर्वी विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण केले होते. त्यानंतर बलिदान दिलेल्या कुटुंबीयांच्या विविध मागण्यासंदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या दोन वेळा बैठका होऊनही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. सरकारला अजूनही मराठा आरक्षणासाठी तरुणांचे बळी हवे आहेत का, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला देण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४२ कुटुंबीयांच्या मागण्या २८ सप्टेंबरपर्यंत मंजूर न केल्यास २९ सप्टेंबर रोजी शहागड (ता. अंबड) येथील गोदावरी नदीच्या उड्डाणपुलावरून उडी घेऊन जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.