शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

आरक्षणासाठी आणखी तरुणांच्या बळीची वाट पाहणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:32 IST

वडीगोद्री/ शहागड : मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्यासह आंदोलने करण्यात आली. यादरम्यान ४२ युवकांनी बलिदान दिले. तरी शासनाकडून अद्याप समाजाचे ...

वडीगोद्री/ शहागड : मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्यासह आंदोलने करण्यात आली. यादरम्यान ४२ युवकांनी बलिदान दिले. तरी शासनाकडून अद्याप समाजाचे प्रश्न मार्गी लावले जात नाहीत. बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. त्यामुळे शासन आणखी मराठा समाजातील युवकांच्या बळी जाण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षण मिळण्यासाठी बलिदान दिलेल्या ४२ शहिदांच्या कुटुंबीयांनी २० दिवसांपूर्वी विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण केले होते. त्यानंतर बलिदान दिलेल्या कुटुंबीयांच्या विविध मागण्यासंदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या दोन वेळा बैठका होऊनही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. सरकारला अजूनही मराठा आरक्षणासाठी तरुणांचे बळी हवे आहेत का, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला देण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४२ कुटुंबीयांच्या मागण्या २८ सप्टेंबरपर्यंत मंजूर न केल्यास २९ सप्टेंबर रोजी शहागड (ता. अंबड) येथील गोदावरी नदीच्या उड्डाणपुलावरून उडी घेऊन जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.