शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रानडुकरांचा धाकलगावात हैदोस; चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:33 IST

पिसाळलेल्या रानडुकराने गावात येऊन चार माणसांसह दोन गायींवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोंद्री : पिसाळलेल्या रानडुकराने गावात येऊन चार माणसांसह दोन गायींवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे घडली.या घटनेत अश्मीरा जुमान पठाण या चार वर्षाच्या मुलीला तोंडात घेऊन पळून जात असतांना गावातील कुत्र्यांनी रानडुकरावर हल्ला करुन तिची सुटका केली. रानडुकराच्या धुमाकुळामुळे गावात एकच खळबळ उडाली होती.रानडुकराने गावात दोन तास धुमाकूळ घातला यात भीमराव शेंडगे, शन्नोबी पठाण, त्यांची मुलगी अलबीरा जुमान पठाण (६), अश्मिरा जुमान पठाण (४) यांना चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या आहेत. अनेक नागरिकांवर हल्ला करून जखमी केले.गावापासून सर्व जंगल परिसर आहे. परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने हिंस्त्र प्राण्यांचा वावर परिसरात वाढला आहे. मंगळवारी सकाळी ऊसाच्या शेतातून पिसाळलेल्या रानडुकर गावात शिरले. भीमराव शेडगे हे घरात झोपले असता रानडुकराने त्यांच्या घरात घुसून त्यांच्या हाताला चावा घेत त्यांना घराबाहेर ओढत आणले. त्यानंतर त्या रानडुकराने गावातील जुमान पठाण यांच्या कुटुंबियांवर हल्ला चढवला. त्यात तीनजण जखमी झाले, तर अन्य एका घटनेत रानडुकराने दत्ता देवडे यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईला चावा घेऊन जखमी केले. तसेच भीमा गाढे यांच्यावरही हल्ला केला, त्यांच्या सर्तकतेमुळे ते त्यातून वाचले. चंद्रकांत गाडगे यांच्यावर देखील हल्ला केला असता त्यांनी तेथून पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले.गेल्या काही महिन्यांपासून रानडुकराचे थैमान या भागात वाढले आहे. याकडे वनविभागाने तातडीने लक्ष देऊन त्यांचा पायबंद करावा अशी मागणी ग्रामस्थांडून केली जात आहे.गावकऱ्यांनी लाठ्या-काठ्या घेऊन रानडुकराचा पाठलाग सुरू केला असता, त्याने गावातील शालिकराम बाळा सराफ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्या हातातील काठीने रानडुकराचा प्रतिकार केला. यावेळी सर्व गावकºयांनी मिळून त्या रानडुकरावर हल्ला चढवून त्याला ठार केले. त्यानंतर खड्डा करून त्याला गावाच्या बाहेर पुरले

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीव