शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाशी बाजारपेठेत आधी कोण जाणार, बक्षिसाच्या लालचेने १५० ट्रक चालकांची बेलगाम वाहतूक

By शिवाजी कदम | Updated: August 17, 2023 18:52 IST

धोकादायक वाहतुकीचे दोन बळी; आणखी किती बळी गेल्यावर पोलिस प्रशासन या मुजोर मिरची वाहन चालकांवर निर्बंध घालणार आहे.

पिंपळगाव रेणुकाई (जालना) : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मिरची उत्पादकांची मोठी बाजारपेठ आहे. येथून मुंबईच्या वाशी बाजारपेठेत मिरचीची वाहतूक होते. रोज दीडशे आयशर ट्रक येथून १७ हजार किलोमीटरचे अंतर पार करून मुंबई गाठतात. लवकर पोहोचणाऱ्या ट्रक चालकांना व्यापाऱ्यांकडून बक्षीस देण्यात येते. या बक्षिसाच्या लालसेपोटी ट्रक चालक सुसाट वेगाने वाहने हाकत असल्याने या रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. मागील आठवड्यात झालेल्या तीन अपघातात दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना कुणाचाही लगाम राहिलेला नाही.

आणखी किती बळी गेल्यावर पोलिस प्रशासन या मुजोर मिरची वाहन चालकांवर निर्बंध घालणार आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे मराठवाड्यातील सर्वात मोठा मिरचीचा बाजार भरतो. येथील हिरव्या मिरचीने देशात कीर्ती मिळवली आहे. त्यामुळे या ठिकाणी राज्यभरातून व्यापारी मिरची खरेदी करण्यासाठी येत असतात. सध्या या बाजारात जवळजवळ नऊ हजार पोती मिरचीची आवक आहे. ही मिरची जवळपास १५० वाहनांद्वारे इतर जिल्ह्यांसह राज्यात विक्रीसाठी जाते. मिरची ट्रकची वाहने सायंकाळी सहा वाजल्यानंतर भोकरदन ते बुलढाणा या एक पदरी रस्त्यावर सुसाट वेगाने धावतात. मिरची वाहतूक करणारे वाहन समोरून आल्यास इतर वाहनांना रस्त्याच्या खाली जावे लागते. यामुळे पोलिसांनी आता प्रत्येक वाहन थांबवून त्यांना ताकीद देणे गरजेचे झाले आहे.

दोन जणांचा मृत्यूमागील आठ दिवसांत देहेड येथील नवाब शहाँ तर वरुड येथील रामू वाघ या दोन तरुणांचा बळी गेला आहे. हे दोन्ही तरुण घरातील कर्ते असल्याने त्यांचे कुटुंब आता रस्त्यावर आले आहे. यापूर्वी देखील अपघाताच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. मिरची वाहनांचा वेग कमी होण्याऐवजी वाढतच चालला असल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.

बक्षिसांसाठी जीवावर उदारपिंपळगाव रेणुकाई येथून मिरची लोड केल्यानंतर १७०० किलोमीटर अंतर २८ तासांत पार करणाऱ्या चालकाला १५ हजार बक्षीस दिले जाते. ३० तासात अंतर पार करणाऱ्याला १० हजार तर ३२ तासात अंतर पार करणाऱ्या चालकाला पाच हजार रुपयाचे बक्षीस व्यापाऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे ट्रक चालक रस्त्यावर वाहन चालवताना केवळ बक्षिसासाठी आपला जीव गहाण ठेवून बेदरकारपणे वाहने चालवतात. मात्र, यामध्ये रस्त्यावर प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिक जीवानिशी जात आहेत.

लगाम लावणे गरजेचेमिरची वाहनांचा वेग हा मर्यादेपेक्षाही अधिक असतो. त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना दोन निष्पापांचे बळी गेले आहेत. यात माझ्या घरातील एका सदस्याचा समावेश आहे. दिवसेंदिवस या घटनेत वाढ होत आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन वाहनधारकांना ताकीद देणे गरजेचे आहे.- सांडू वाघ, भाजपा तालुका उपाध्यक्ष.

टॅग्स :MarketबाजारFarmerशेतकरीroad safetyरस्ते सुरक्षाJalanaजालना