शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशी बाजारपेठेत आधी कोण जाणार, बक्षिसाच्या लालचेने १५० ट्रक चालकांची बेलगाम वाहतूक

By शिवाजी कदम | Updated: August 17, 2023 18:52 IST

धोकादायक वाहतुकीचे दोन बळी; आणखी किती बळी गेल्यावर पोलिस प्रशासन या मुजोर मिरची वाहन चालकांवर निर्बंध घालणार आहे.

पिंपळगाव रेणुकाई (जालना) : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मिरची उत्पादकांची मोठी बाजारपेठ आहे. येथून मुंबईच्या वाशी बाजारपेठेत मिरचीची वाहतूक होते. रोज दीडशे आयशर ट्रक येथून १७ हजार किलोमीटरचे अंतर पार करून मुंबई गाठतात. लवकर पोहोचणाऱ्या ट्रक चालकांना व्यापाऱ्यांकडून बक्षीस देण्यात येते. या बक्षिसाच्या लालसेपोटी ट्रक चालक सुसाट वेगाने वाहने हाकत असल्याने या रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. मागील आठवड्यात झालेल्या तीन अपघातात दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना कुणाचाही लगाम राहिलेला नाही.

आणखी किती बळी गेल्यावर पोलिस प्रशासन या मुजोर मिरची वाहन चालकांवर निर्बंध घालणार आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे मराठवाड्यातील सर्वात मोठा मिरचीचा बाजार भरतो. येथील हिरव्या मिरचीने देशात कीर्ती मिळवली आहे. त्यामुळे या ठिकाणी राज्यभरातून व्यापारी मिरची खरेदी करण्यासाठी येत असतात. सध्या या बाजारात जवळजवळ नऊ हजार पोती मिरचीची आवक आहे. ही मिरची जवळपास १५० वाहनांद्वारे इतर जिल्ह्यांसह राज्यात विक्रीसाठी जाते. मिरची ट्रकची वाहने सायंकाळी सहा वाजल्यानंतर भोकरदन ते बुलढाणा या एक पदरी रस्त्यावर सुसाट वेगाने धावतात. मिरची वाहतूक करणारे वाहन समोरून आल्यास इतर वाहनांना रस्त्याच्या खाली जावे लागते. यामुळे पोलिसांनी आता प्रत्येक वाहन थांबवून त्यांना ताकीद देणे गरजेचे झाले आहे.

दोन जणांचा मृत्यूमागील आठ दिवसांत देहेड येथील नवाब शहाँ तर वरुड येथील रामू वाघ या दोन तरुणांचा बळी गेला आहे. हे दोन्ही तरुण घरातील कर्ते असल्याने त्यांचे कुटुंब आता रस्त्यावर आले आहे. यापूर्वी देखील अपघाताच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. मिरची वाहनांचा वेग कमी होण्याऐवजी वाढतच चालला असल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.

बक्षिसांसाठी जीवावर उदारपिंपळगाव रेणुकाई येथून मिरची लोड केल्यानंतर १७०० किलोमीटर अंतर २८ तासांत पार करणाऱ्या चालकाला १५ हजार बक्षीस दिले जाते. ३० तासात अंतर पार करणाऱ्याला १० हजार तर ३२ तासात अंतर पार करणाऱ्या चालकाला पाच हजार रुपयाचे बक्षीस व्यापाऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे ट्रक चालक रस्त्यावर वाहन चालवताना केवळ बक्षिसासाठी आपला जीव गहाण ठेवून बेदरकारपणे वाहने चालवतात. मात्र, यामध्ये रस्त्यावर प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिक जीवानिशी जात आहेत.

लगाम लावणे गरजेचेमिरची वाहनांचा वेग हा मर्यादेपेक्षाही अधिक असतो. त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना दोन निष्पापांचे बळी गेले आहेत. यात माझ्या घरातील एका सदस्याचा समावेश आहे. दिवसेंदिवस या घटनेत वाढ होत आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन वाहनधारकांना ताकीद देणे गरजेचे आहे.- सांडू वाघ, भाजपा तालुका उपाध्यक्ष.

टॅग्स :MarketबाजारFarmerशेतकरीroad safetyरस्ते सुरक्षाJalanaजालना