शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जालना जिल्हाधिकाऱ्याच्या मागे अदृश्य शक्ती कोण?; गोपीचंद पडळकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 19:07 IST

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले नाही; आमदार पडळकर यांचा आरोप

जालना : धनगर समाजाच्या मोर्चावेळी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात जो प्रकार घडला तो घडवण्यामागे कोण आहे याची चौकशी करण्याची  मागणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे आमदार आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज जाहीर केले. तसेच जालन्यातील जिल्हाधिकारी आणि अतिरीक्त पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांमागे अदृश्य हात कोणाचे आहेत? असा आरोपही आमदार पडळकर यांनी केला. 

जालना जिल्ह्यातील जामखेड येथे धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. येथे काही आंदोलक आमरण उपोषण करत आहेत. त्यांची भेट आज गोपीचंद पडळकर यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,२१ नोव्हेंबर रोजी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कल्पना असूनही निवेदन स्वीकारण्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम अधिकारी आला नाही. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. त्यातून काही कुंड्या फुटल्या, एका गाडीची काच फुटली. याप्रकरणी पोलिस अधिक्षकांशी आमचे बोलणे झाले, त्यातून आम्ही त्यांना दहा आंदोलकांची नावे दिली.

मात्र, त्यानंतर पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हे दाखल केले. हे कसे झाले? एकूणच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले नाही. या अधिकाऱ्यांच्या मागे कोणाचे अदृश्य हात आहेत. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण गृहमंत्री फडणवीस यांना करणार असल्याचेही आमदार पडळकर यांनी सांगितले. याबाबत एक पत्र देखील आपण गृहमंत्री फडणवीस यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच ३६ जणांवरील गुन्हे रद्द करावेत, डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करा; अशी मागणी देखील त्यांनी केली. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षणJalanaजालना