शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

जालना जिल्हाधिकाऱ्याच्या मागे अदृश्य शक्ती कोण?; गोपीचंद पडळकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 19:07 IST

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले नाही; आमदार पडळकर यांचा आरोप

जालना : धनगर समाजाच्या मोर्चावेळी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात जो प्रकार घडला तो घडवण्यामागे कोण आहे याची चौकशी करण्याची  मागणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे आमदार आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज जाहीर केले. तसेच जालन्यातील जिल्हाधिकारी आणि अतिरीक्त पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांमागे अदृश्य हात कोणाचे आहेत? असा आरोपही आमदार पडळकर यांनी केला. 

जालना जिल्ह्यातील जामखेड येथे धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. येथे काही आंदोलक आमरण उपोषण करत आहेत. त्यांची भेट आज गोपीचंद पडळकर यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,२१ नोव्हेंबर रोजी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कल्पना असूनही निवेदन स्वीकारण्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम अधिकारी आला नाही. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. त्यातून काही कुंड्या फुटल्या, एका गाडीची काच फुटली. याप्रकरणी पोलिस अधिक्षकांशी आमचे बोलणे झाले, त्यातून आम्ही त्यांना दहा आंदोलकांची नावे दिली.

मात्र, त्यानंतर पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हे दाखल केले. हे कसे झाले? एकूणच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले नाही. या अधिकाऱ्यांच्या मागे कोणाचे अदृश्य हात आहेत. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण गृहमंत्री फडणवीस यांना करणार असल्याचेही आमदार पडळकर यांनी सांगितले. याबाबत एक पत्र देखील आपण गृहमंत्री फडणवीस यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच ३६ जणांवरील गुन्हे रद्द करावेत, डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करा; अशी मागणी देखील त्यांनी केली. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षणJalanaजालना