शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जालना जिल्हाधिकाऱ्याच्या मागे अदृश्य शक्ती कोण?; गोपीचंद पडळकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 19:07 IST

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले नाही; आमदार पडळकर यांचा आरोप

जालना : धनगर समाजाच्या मोर्चावेळी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात जो प्रकार घडला तो घडवण्यामागे कोण आहे याची चौकशी करण्याची  मागणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे आमदार आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज जाहीर केले. तसेच जालन्यातील जिल्हाधिकारी आणि अतिरीक्त पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांमागे अदृश्य हात कोणाचे आहेत? असा आरोपही आमदार पडळकर यांनी केला. 

जालना जिल्ह्यातील जामखेड येथे धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. येथे काही आंदोलक आमरण उपोषण करत आहेत. त्यांची भेट आज गोपीचंद पडळकर यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,२१ नोव्हेंबर रोजी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कल्पना असूनही निवेदन स्वीकारण्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम अधिकारी आला नाही. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. त्यातून काही कुंड्या फुटल्या, एका गाडीची काच फुटली. याप्रकरणी पोलिस अधिक्षकांशी आमचे बोलणे झाले, त्यातून आम्ही त्यांना दहा आंदोलकांची नावे दिली.

मात्र, त्यानंतर पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हे दाखल केले. हे कसे झाले? एकूणच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले नाही. या अधिकाऱ्यांच्या मागे कोणाचे अदृश्य हात आहेत. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण गृहमंत्री फडणवीस यांना करणार असल्याचेही आमदार पडळकर यांनी सांगितले. याबाबत एक पत्र देखील आपण गृहमंत्री फडणवीस यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच ३६ जणांवरील गुन्हे रद्द करावेत, डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करा; अशी मागणी देखील त्यांनी केली. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षणJalanaजालना