शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

महिला सदस्यांच्या गळ्यात हार केव्हा पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST

टेंभुर्णी : महिलांचे सबलीकरण व्हावे, यासाठी राजकारणात महिलांचा सहभाग वाढविण्यात आला. ग्रामपंचायतीत महिलांसाठी पन्नास टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या. ...

टेंभुर्णी : महिलांचे सबलीकरण व्हावे, यासाठी राजकारणात महिलांचा सहभाग वाढविण्यात आला. ग्रामपंचायतीत महिलांसाठी पन्नास टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या. मात्र, असे असले तरी आजही ग्रामीण भागात राजकारणातील सहभाग केवळ कागदोपत्रीच दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर निवडणूक जिंकल्यानंतर सत्काराचा एक हारही गळ्यात पडण्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र टेंभुर्णीसह परिसरात दिसून येत आहे.

टेंभुर्णीसह परिसरातील जवळपास आठ गावांत नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यात अनेक गावांतून महिला सदस्या निवडून आल्या आहेत. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतरही या महिला सदस्यांना घरातच ठेवून जागोजागी पुरुष मंडळीच सदस्य म्हणून मानसन्मान स्वीकारत आहेत.

टेंभुर्णी ग्रामपंचायतीतील १७ सदस्यांत १० महिला सदस्या निवडून आल्या आहेत. मात्र, ग्रामपंचायतीचा निकाल लागून १५ ते १६ दिवस उलटले असले तरी गावात अद्याप एकही महिला सदस्याचा कुठे सत्कार झाल्याचे दिसून येत नाही. कुठे पती, कुठे मुलगा तर कुठे दिर या महिलांचा सत्कार मोठ्या सन्मानाने स्वीकारण्यात धन्यता मानत आहेत. अशीच परिस्थिती परिसरातील निवडणूक झालेल्या अन्य गावांतही दिसून येत आहे. या महिला सदस्यांना आता सत्काराच्या एका हारासाठी थेट सरपंच पदाच्या निवडणुकीपर्यंत तरी अजून वाट पहावी लागणार असल्याचे अनेकजण बोलून दाखवित आहेत.

चौकट

महिलांनी राजकारणात खंबीरपणे नेतृत्व करावे म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांनी प्रथम महिलांसाठी ५० टक्के आरक्षण दिले. मात्र, आजही ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी महिलांना बाजूला ठेवून पुरुषच सत्ता गाजवित असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येते. अनेक महिला सदस्या उच्चशिक्षित असूनही त्यांनाही पुढे येऊ दिले जात नाही. अखेर हे पुरूषराज किती दिवस चालणार ? यासाठी महिलांनीही पुरुषी वर्चस्व झुगारून सक्षमपणे पुढे येणे गरजेचे आहे. महिला सदस्यांच्या सबलीकरणासाठी आम्ही भविष्यात जिल्हाभर कार्यशाळेचे आयोजन करू.

सुरेखा लहाने, जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काॅंग्रेस, जाफराबाद.