शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

उद्योगांचे चाक मंदावले; कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना काम मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

जालना : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागरिकांप्रमाणेच उद्योग जगतही हादरले आहे. काही मोजके उद्योग वगळता अन्य उद्योग नावालाच ...

जालना : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागरिकांप्रमाणेच उद्योग जगतही हादरले आहे. काही मोजके उद्योग वगळता अन्य उद्योग नावालाच सुरू असल्याचे वास्तव दिसून आले.

जालना शहर व परिसरात स्टील उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला आहे. परंतु, या उद्योगातही ऑक्सिजनची मोठी मागणी असल्याने हा उद्योग अडचणीत सापडला आहे. केवळ ३० सिलिंडर वापरण्याची मुभा देण्यात आली आहे तर प्रत्यक्षात शंभर ते दीडशे सिलिंडरची गरज असते. ती पूर्ण होत नसल्याने हा उद्योग संकटात सापडला आहे. स्टीलप्रमाणेच लघु उद्योगही जालन्यात मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे. असे असले तरी कोरोनामुळे रोजंदारीवर येणाऱ्या कामगारांमध्ये मोठी घट झाली आहे तर दुसरीकडे कुशल कामगारांची पाहिजे तेवढी मागणी पूर्ण होत नसल्याने उद्योग अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने यावेळी कुलर निर्मिती उद्योग पूर्णपणे कोलमडला आहे. त्यापाठोपाठ व्हेंडर अर्थात मोठ्या उद्योगांना त्यांच्या मागणीनुसार साहित्य पुरविणे या उद्योगाला शक्य होत नाही. पूर्वीप्रमाणे मागणीतही मोठी घट झाली आहे.

जालना शहरात बियाणे उद्योग सध्या तेजीत असून, तेथे जास्त करून महिला कामगारांची संख्या असल्याने या उद्योगाला अडचण येत नाही.

कच्चा माल मिळण्यात अडचणी

संपूर्ण राज्यभर आणि देशातील बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळणारा कच्चा मालही सहज उपलब्ध होत नाही. अधिकचे भाडे आकारून तो रस्ते वाहतुकीद्वारे आणावा लागत आहे. परदेशातून येणारे स्क्रॅब हा स्टील उद्योगासाठी महत्त्वाचा कच्चा माल असतो. परंतु, त्याचेही दर वाढलेले असल्याने तो दखील स्थानिक उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अत्यावश्यक सेवा सोडल्यास वाहतुकीचीही अडचण निर्माण झाली आहे.

कोरोनाचा फटका रोजंदारीलाही बसला आहे. आधी आम्हाला एक दिवस काम केल्यास चारशे रुपये मिळत होते. आज ज्या कंपनीत चारशे रुपये देत होते, तेथे केवळ दोनशे रुपये देऊन काम करून घेतले जात आहे. ही बाब आर्थिक संकटाची म्हणावी लागेल.

-बिहारीलाल परदेशी-डोगरा

कोरोनामुळे अनेक उद्योग अडचणीत आल्याने आम्हाला रोजंदारीवर मिळणारा (कॅज्युअल) तसेच कामगारांना आता काम मिळणे अवघड झाले आहे. जवळपास पाचशेपेक्षा अधिक कामगारांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

- हरिदास जाधव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्योगांना सूट दिली आहे. यामुळे किमान उद्योग तरण्यास मदत झाली आहे. शंभर टक्के उत्पादन होत नसले, तरी किमान ६० ते ४० टक्के उत्पादन करून कामगारांचे वेतन, वीजबिल आणि अन्य खर्च यामुळे भागविण्यास मदत होत आहे.

-प्रज्ञेश केनिया

कोरोनामुळे अन्य व्यवसायांसोबतच लघु उद्योगही अडचणीत आले आहेत. ही बाब केंद्र आणि राज्य सरकारने लक्षात घेऊन या उद्योगांना विशेष पॅकेज जाहीर करावे. या पॅकेजमधील २५ टक्के हिस्सा हा कामगारांसाठीदेखील ठेवावा, जेणेकरून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटवणे शक्य होईल. - अविनाश देशपांडे, अध्यक्ष, लघु उद्योग भारती

कोरोना असला तरी सरकारने उद्योग बंद केले नाहीत, ही बाब सकारात्मक म्हणावी लागेल. यामुळे ज्या ऑर्डर घेतल्या होत्या, त्या पूर्ण करताना अडचणीत येत नाहीत. कुशल कामगारांच्या मदतीतूनच ही कामे केली जात असल्याने उद्योग जगतात मरगळ आलेली नाही.

- सुनील रायठठ्ठा