शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

कितीही देव पाण्यात ठेवा, सरकार पाच वर्षे टिकणार- राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 01:11 IST

कोणी कितीही देव पाण्यात ठेवले तरी आमचे महाआघाडीचे सरकार पाच टिकणार असल्याचा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : कोणी कितीही देव पाण्यात ठेवले तरी आमचे महाआघाडीचे सरकार पाच टिकणार असल्याचा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील आरोग्य विभागासह इतर प्रश्न सोडवून विकास कामांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाहीही राजेश टोपे यांनी यावेळी दिली.राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी सोमवारी परतूर येथे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. सत्काराला उत्तर देताना टोपे बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, भाऊसाहेब गोरे, गोपाळराव बोराडे, बळीराम कडपे, मनोज मरकड, संभाजी देशमुख, अन्वर देशमुख, कुणाल आकात आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, लोकांच्या मदतीशिवाय काही होऊ शकत नाही. लोकांचीच इच्छा भाजपाला बाजूला ठेवायची होती. त्या विचारातून आमचे महाआघाडीचे सरकार निर्माण झाले आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. कारण यामागे जबाबदारी बरोबरच प्रेम व विश्वास आहे. आमचे सरकार लोकहिताचे आहे. सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी यांना केंद्र माणून विकासाच्या योजना आम्ही आखणार आहोत. दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असून, त्यावरील कर्जही माफ करण्यासाठी उपसमिती नियुक्त केली आहे. मात्र दोन लाखाच्या वरची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.जिल्ह्यातील आरोग्य केंद्राचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील. शासकीय रूग्णालय ही गरिबांचा आधार आहेत. ती समृध्द करण्याकडे आमचा कल राहणार आहे. आम्ही पाच वर्षात विकासाला गती देण्याचे काम करू. माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी काटेकोरपणे जनतेची कामे करून विश्वासाने पूर्ण करेन, असेही टोपे यावेळी म्हणाले.यावेळी महेबूब शेख म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कामाकडे पाहून आता युवकांचे वय किती असावे, असा प्रश्न पडला आहे. त्यांच्याकडे पाहून युवकांना प्रेरणा मिळते. निवडणुकीच्या काळात काही नवीन पहेलवान आले होते. शरद पवार यांनी त्यांना त्यांची जागा दाखवल्याचे सांगत युवकांनी संघटित होऊन पक्षाचे कार्य करावे, असे आवाहनही शेख यांनी केले. यावेळी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, गोपाळराव बोराडे, भाऊसाहेब गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्कार कार्यक्रमानिमित्त शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. कार्यक्रमास जगन्नाथ काकडे, आसाराम लाटे, ओंकार काटे, अखिल पठाण, योगेश बरकुले, बंडूअप्पा मुळे, प्रभाकर धुमाळ आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेGovernmentसरकारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस