शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कितीही देव पाण्यात ठेवा, सरकार पाच वर्षे टिकणार- राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 01:11 IST

कोणी कितीही देव पाण्यात ठेवले तरी आमचे महाआघाडीचे सरकार पाच टिकणार असल्याचा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : कोणी कितीही देव पाण्यात ठेवले तरी आमचे महाआघाडीचे सरकार पाच टिकणार असल्याचा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील आरोग्य विभागासह इतर प्रश्न सोडवून विकास कामांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाहीही राजेश टोपे यांनी यावेळी दिली.राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी सोमवारी परतूर येथे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. सत्काराला उत्तर देताना टोपे बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, भाऊसाहेब गोरे, गोपाळराव बोराडे, बळीराम कडपे, मनोज मरकड, संभाजी देशमुख, अन्वर देशमुख, कुणाल आकात आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, लोकांच्या मदतीशिवाय काही होऊ शकत नाही. लोकांचीच इच्छा भाजपाला बाजूला ठेवायची होती. त्या विचारातून आमचे महाआघाडीचे सरकार निर्माण झाले आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. कारण यामागे जबाबदारी बरोबरच प्रेम व विश्वास आहे. आमचे सरकार लोकहिताचे आहे. सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी यांना केंद्र माणून विकासाच्या योजना आम्ही आखणार आहोत. दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असून, त्यावरील कर्जही माफ करण्यासाठी उपसमिती नियुक्त केली आहे. मात्र दोन लाखाच्या वरची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.जिल्ह्यातील आरोग्य केंद्राचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील. शासकीय रूग्णालय ही गरिबांचा आधार आहेत. ती समृध्द करण्याकडे आमचा कल राहणार आहे. आम्ही पाच वर्षात विकासाला गती देण्याचे काम करू. माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी काटेकोरपणे जनतेची कामे करून विश्वासाने पूर्ण करेन, असेही टोपे यावेळी म्हणाले.यावेळी महेबूब शेख म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कामाकडे पाहून आता युवकांचे वय किती असावे, असा प्रश्न पडला आहे. त्यांच्याकडे पाहून युवकांना प्रेरणा मिळते. निवडणुकीच्या काळात काही नवीन पहेलवान आले होते. शरद पवार यांनी त्यांना त्यांची जागा दाखवल्याचे सांगत युवकांनी संघटित होऊन पक्षाचे कार्य करावे, असे आवाहनही शेख यांनी केले. यावेळी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, गोपाळराव बोराडे, भाऊसाहेब गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्कार कार्यक्रमानिमित्त शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. कार्यक्रमास जगन्नाथ काकडे, आसाराम लाटे, ओंकार काटे, अखिल पठाण, योगेश बरकुले, बंडूअप्पा मुळे, प्रभाकर धुमाळ आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेGovernmentसरकारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस