शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

खड्ड्यांसोबत सेल्फी काय घेता? विकासकामांचे बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:04 IST

राष्ट्रवादीचे नेते फेसबुकवर खड्ड्यांसोबत सेल्फी काढून विकासकामांबद्दल प्रश्न विचारत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनो, फेसबुक सोडून प्रत्यक्षात समोरासमोर या आणि जाहीर चर्चा करा, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : राष्ट्रवादीचे नेते फेसबुकवर खड्ड्यांसोबत सेल्फी काढून विकासकामांबद्दल प्रश्न विचारत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनो, फेसबुक सोडून प्रत्यक्षात समोरासमोर या आणि जाहीर चर्चा करा, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे दिले.जालना-वडीगोद्री मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी ३३७ कोटींचा निधी मंजूर करवून आणल्याबद्दल खा. दानवे यांचा अंबड तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने पं. गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.खा. दानवे म्हणाले की, तुमच्या पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात तुम्ही जिल्ह्यात कोणती विकासकामे केली, किती निधी आणला ते सांगावे. आमच्या केवळ तीन वर्षांत विकासकामांसाठी किती निधी आणला ते सांगतो. जिल्ह्यात तब्बल सहा हजार कोटींची केवळ रस्त्यांची कामे सुरु आहेत. एक हजार कोटी रुपयांच्या ड्रायपोर्टचे काम सुरु आहे. आयसीटी कॉलेज मंजूर केले, त्यासाठी २०० एकर जागा उपलब्ध करुन दिली. सीड्स पार्कचे काम सुरु आहे. जालना शहरात ६० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली आहेत, अशी अनेक विकासकामे सांगता येतील.सगळे मिळून माझा पराभव करु, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. आता तुमची मला रोखण्याची काय बिशाद आहे? अशा शब्दात खा. दानवे यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसह विरोधकांना आव्हान दिले.आ. नारायण कुचे म्हणाले की, अंबड शहराचा जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्याचे काम आम्ही केले. मात्र श्रेय लाटण्यासाठी आ. राजेश टोपे यांनी केविलवाणा प्रयत्न केला. शहरातील पाचोड नाका येथे नियोजित छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाच्या सुशोभीकरणासाठी १६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून त्याचे कंत्राट निघाल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी नगराध्यक्षा संगीता कुचे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, देविदास कुचे, साहेबराव खरात, दीपकसिंग ठाकूर, गंगासागर पिंगळे, अंबादास अंभोरे, चंद्रप्रकाश सोडाणी, अरुण उपाध्ये, संदीप काबरा, संतोष सोमाणी, किरण खरात, विश्वजित खरात, शहराध्यक्ष संदीप खरात, गंगाधर वराडे, सौरभ कुलकर्णी, राहुल खरात, फिरोज अध्यक्ष, विष्णू पुंड, अशोक लांडे, नारायण खले, ओमप्रकाश उबाळे, रमेश शहाणे, सुनील खानचंदानी, युसूफ मणियार, नसीर बागवान, अय्युब बागवान, राजेंद्र डहाळे, सुहास सोडाणी, अ‍ॅड. लक्ष्मण गायके, प्रसाद झाडे, अ‍ॅड. आशा गाडेकर, इंदुमती घुगे, शिवाजी बजाज, नीलेश लोहिया, ओमसेठ जाजू आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शेखर मोहरीर यांनी केले.रावसाहेब दानवेच्या नादी लागणे एवढे सोपे नाही, ही तर सुरुवात आहे. पुढे बघा, तुम्हाला कशी पळता भुई थोडी करतो असे आव्हान खा.दानवे यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता दिले.