शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांसोबत सेल्फी काय घेता? विकासकामांचे बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:04 IST

राष्ट्रवादीचे नेते फेसबुकवर खड्ड्यांसोबत सेल्फी काढून विकासकामांबद्दल प्रश्न विचारत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनो, फेसबुक सोडून प्रत्यक्षात समोरासमोर या आणि जाहीर चर्चा करा, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : राष्ट्रवादीचे नेते फेसबुकवर खड्ड्यांसोबत सेल्फी काढून विकासकामांबद्दल प्रश्न विचारत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनो, फेसबुक सोडून प्रत्यक्षात समोरासमोर या आणि जाहीर चर्चा करा, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे दिले.जालना-वडीगोद्री मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी ३३७ कोटींचा निधी मंजूर करवून आणल्याबद्दल खा. दानवे यांचा अंबड तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने पं. गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.खा. दानवे म्हणाले की, तुमच्या पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात तुम्ही जिल्ह्यात कोणती विकासकामे केली, किती निधी आणला ते सांगावे. आमच्या केवळ तीन वर्षांत विकासकामांसाठी किती निधी आणला ते सांगतो. जिल्ह्यात तब्बल सहा हजार कोटींची केवळ रस्त्यांची कामे सुरु आहेत. एक हजार कोटी रुपयांच्या ड्रायपोर्टचे काम सुरु आहे. आयसीटी कॉलेज मंजूर केले, त्यासाठी २०० एकर जागा उपलब्ध करुन दिली. सीड्स पार्कचे काम सुरु आहे. जालना शहरात ६० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली आहेत, अशी अनेक विकासकामे सांगता येतील.सगळे मिळून माझा पराभव करु, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. आता तुमची मला रोखण्याची काय बिशाद आहे? अशा शब्दात खा. दानवे यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसह विरोधकांना आव्हान दिले.आ. नारायण कुचे म्हणाले की, अंबड शहराचा जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्याचे काम आम्ही केले. मात्र श्रेय लाटण्यासाठी आ. राजेश टोपे यांनी केविलवाणा प्रयत्न केला. शहरातील पाचोड नाका येथे नियोजित छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाच्या सुशोभीकरणासाठी १६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून त्याचे कंत्राट निघाल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी नगराध्यक्षा संगीता कुचे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, देविदास कुचे, साहेबराव खरात, दीपकसिंग ठाकूर, गंगासागर पिंगळे, अंबादास अंभोरे, चंद्रप्रकाश सोडाणी, अरुण उपाध्ये, संदीप काबरा, संतोष सोमाणी, किरण खरात, विश्वजित खरात, शहराध्यक्ष संदीप खरात, गंगाधर वराडे, सौरभ कुलकर्णी, राहुल खरात, फिरोज अध्यक्ष, विष्णू पुंड, अशोक लांडे, नारायण खले, ओमप्रकाश उबाळे, रमेश शहाणे, सुनील खानचंदानी, युसूफ मणियार, नसीर बागवान, अय्युब बागवान, राजेंद्र डहाळे, सुहास सोडाणी, अ‍ॅड. लक्ष्मण गायके, प्रसाद झाडे, अ‍ॅड. आशा गाडेकर, इंदुमती घुगे, शिवाजी बजाज, नीलेश लोहिया, ओमसेठ जाजू आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शेखर मोहरीर यांनी केले.रावसाहेब दानवेच्या नादी लागणे एवढे सोपे नाही, ही तर सुरुवात आहे. पुढे बघा, तुम्हाला कशी पळता भुई थोडी करतो असे आव्हान खा.दानवे यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता दिले.