शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

विद्यार्थ्यांसाठी पायघड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:52 IST

उन्हाळी सुटी नंतर शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये उघडली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत झाल्याने विद्यार्थी भारावून गेल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाळी सुटी नंतर शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये उघडली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत झाल्याने विद्यार्थी भारावून गेल्याचे दिसून आले.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास २००० हजार आणि अन्य शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये शुक्रवारी अत्यंत उत्साही वातावरण होते. अनेक शाळांमध्ये मोठमोठ्या रांगोळ्या रेखाटलेल्या दिसून आल्या, तर काही शाळांमध्ये वाजंत्रीच्या मंगलस्वरांनी विद्यार्थ्यांचे वेलकम करण्यात आले. या प्रवेशोत्सवामुळे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी व पालकांसाठी संस्मरणीय राहणार आहे.शुक्रवारी सकाळी येथील भाग्यनगर स्थित सुरेखा प्राथमिक शाळेत राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, पंडित भुतेकर, पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी खरात, रवी जोशी, पी.आर. जाधव, संस्थेच्या अध्यक्षा वर्षा साहनी, सचिव उषाताई देशपांडे, विनित साहनी, अनुराग कपूर, पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे, मुख्याध्यापिका सविता कुलकर्णी, रवींद्र देशपांडे यांच्याह शिक्षक व पंचायत समिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाभरात सर्वत्र आनंदाचे वातारण होते. बुटखेडा येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरणुक काढण्यात आली.येथीलच संस्कार प्रबोधनी विद्यालयात वाजंत्रीच्या निनादात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थी प्रार्थनेस उभे असताना त्यांच्यावर पृष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक इश्वर वाघ, शिक्षक रामदास कुलकर्णी, किरण घुले, हिवाळे, कागवटे, रासवे, तडवी यांच्यासह अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. येथील राष्ट्रीय हिंदी विद्यालय, सीटीएमके गुजराती विद्यालय, सरस्वती भुवन, कन्यापाठ प्रशाला, महावीर स्थानकवासी जैन विद्यालय, नाथानी हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, शांतीनिकेतन विद्यालय, जालना न.प. शाळा क्रमांक १, चंदनझिरा यांच्यासह शहरातील अन्य सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साही वातारणात स्वागत करण्यात आले.बुटखेडा येथील कार्यक्रमाला जालना जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांच्यासह जाफराबाद पं. स. चे सभापती साहेबराव कानडजे, बुटखेडा येथील सरपंच रुखमीना पवार, पं. स. सदस्या गीता बोर्डे, शाळा समिती अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, प्राचार्य जगराम भटकर, अधिव्याख्याता डॉ. प्रकाश मांटे, उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी, गटविकास अधिकारी रमेश काळे, गटशिक्षणाधिकारी उमेश जैन, व्ही. व्ही. वडजे, सुनील मावकर, सुधीर जोशी, केंद्रप्रमुख गजानन मांटे, मुख्याध्यापक अंबादास तळेकर, शिक्षक विजय भानुसे, रावसाहेब चित्ते, पुंजाराम मुंढे, रामभाऊ कोल्हे, अर्चना बिलोरे, आश्रूबा जायभाये, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. यावेळी निमा अरोरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.जालना शहरातील नगर परिषदेच्या शाळांमध्ये देखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. काही शाळांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेच्या कन्या विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्हाभरातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये देखील जल्लोषपूर्ण वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

 

टॅग्स :Schoolशाळाeducationशैक्षणिक