शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:25 IST

आरोग्य सेवेचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, अशी सूचना आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या काळात आरोग्याचे प्रश्न सोडवून आरोग्य सेवेचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, अशी सूचना आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी दिली.जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी शिक्षण व आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जि. प. अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासह सर्व सदस्य, आरोग्य व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.बैठकीच्या सुरुवातीलाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर बैठकीला सुरूवात झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी आरोग्य विभागाने केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा सांगितला. आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची परिस्थिती बिकट आहे. आरोग्य केंद्र व उपआरोग्य केंद्रांच्या इमारती मोडकळीस आल्या आहे. तसेच आरोग्य केंद्रातील साहित्य धूळ खात पडलेले आहे. जिल्हाभरात आरोग्य सेविका, सेवक व डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. हे सर्व प्रश्न आपल्याला तातडीने सोडायचे असून, या कामांसाठी आपण निधी कमी पडू देणार नाही.जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा चेहरा बदलायचा असेल तर अधिका-यांसह झेडपी सदस्यांनीही आरोग्य सेवा सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे. लवकरच राज्यभरातील रिक्त असलेली ४० ते ४५ हजार डॉक्टरांची पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्त पदांचाही प्रश्न सुटणार आहे.आपल्याला पहिल्यांदा जालना जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा चेहरामोहरा बदलायचा आहे.त्यामुळे लागेल तेवढा निधी आपण द्याला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आदींची उपस्थिती होती.पिंपरखेडा बु. येथील आरोग्य केंद्राला मंजुरीजालना जिल्ह्यात ४० आरोग्य केंदे्र कार्यरत आहेत. ३ आरोग्य केंद्रांना मान्यता मिळाली आहे तर पिंपरखेडा येथील आरोग्य केंद्राला दोन दिवसांपूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. जिरडगाव येथील आरोग्य केंद्राचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य अधिका-यांना दिल्या.आरोग्य केंद्रांकडे लक्ष द्याजालना जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची स्थिती फार चांगली नाही. त्यामुळे आरोग्य केंद्रांचा चेहरामोहरा बदलण्याची गरज आहे. आरोग्य केंद्रात आधुनिक उपकरणांचा वापर करा. आरोग्य केंद्राबाहेर झाडे लावून त्याची निगा राखा, निधीची गरज भासल्यास मी तुम्हाला निधी देतो. आरोग्य सेवेचे काम जालन्यातूनच होईल, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.तालुकास्तरावर सर्व सुविधा असणारे रूग्णालय उभारणारतालुकास्तरावरच सर्व सुविधा असणारे रूग्णालय उभारण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात हे रूग्णालय उभारण्यात येणार असून, यासाठी लवकरच काम करण्यात येणार आहे. तसेच मेन्टल आणि आयुष्य हे दोन्ही दवाखाने सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल