शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:25 IST

आरोग्य सेवेचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, अशी सूचना आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या काळात आरोग्याचे प्रश्न सोडवून आरोग्य सेवेचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, अशी सूचना आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी दिली.जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी शिक्षण व आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जि. प. अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासह सर्व सदस्य, आरोग्य व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.बैठकीच्या सुरुवातीलाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर बैठकीला सुरूवात झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी आरोग्य विभागाने केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा सांगितला. आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची परिस्थिती बिकट आहे. आरोग्य केंद्र व उपआरोग्य केंद्रांच्या इमारती मोडकळीस आल्या आहे. तसेच आरोग्य केंद्रातील साहित्य धूळ खात पडलेले आहे. जिल्हाभरात आरोग्य सेविका, सेवक व डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. हे सर्व प्रश्न आपल्याला तातडीने सोडायचे असून, या कामांसाठी आपण निधी कमी पडू देणार नाही.जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा चेहरा बदलायचा असेल तर अधिका-यांसह झेडपी सदस्यांनीही आरोग्य सेवा सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे. लवकरच राज्यभरातील रिक्त असलेली ४० ते ४५ हजार डॉक्टरांची पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्त पदांचाही प्रश्न सुटणार आहे.आपल्याला पहिल्यांदा जालना जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा चेहरामोहरा बदलायचा आहे.त्यामुळे लागेल तेवढा निधी आपण द्याला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आदींची उपस्थिती होती.पिंपरखेडा बु. येथील आरोग्य केंद्राला मंजुरीजालना जिल्ह्यात ४० आरोग्य केंदे्र कार्यरत आहेत. ३ आरोग्य केंद्रांना मान्यता मिळाली आहे तर पिंपरखेडा येथील आरोग्य केंद्राला दोन दिवसांपूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. जिरडगाव येथील आरोग्य केंद्राचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य अधिका-यांना दिल्या.आरोग्य केंद्रांकडे लक्ष द्याजालना जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची स्थिती फार चांगली नाही. त्यामुळे आरोग्य केंद्रांचा चेहरामोहरा बदलण्याची गरज आहे. आरोग्य केंद्रात आधुनिक उपकरणांचा वापर करा. आरोग्य केंद्राबाहेर झाडे लावून त्याची निगा राखा, निधीची गरज भासल्यास मी तुम्हाला निधी देतो. आरोग्य सेवेचे काम जालन्यातूनच होईल, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.तालुकास्तरावर सर्व सुविधा असणारे रूग्णालय उभारणारतालुकास्तरावरच सर्व सुविधा असणारे रूग्णालय उभारण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात हे रूग्णालय उभारण्यात येणार असून, यासाठी लवकरच काम करण्यात येणार आहे. तसेच मेन्टल आणि आयुष्य हे दोन्ही दवाखाने सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल