शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

२२ दिवसात वाढला २९ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST

जालना : चालू महिन्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. गत आठवड्यापासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. सातत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ...

जालना : चालू महिन्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. गत आठवड्यापासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. सातत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ६४ पैकी ४६ प्रकल्प तुडुंब भरले आहेत. विशेषत: मागील २२ दिवसांमध्येच या प्रकल्पांमध्ये तब्बल २९ टक्के पाणीसाठा वाढला आहे.

यंदा प्रारंभीपासूनच पावसाने जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०३.१० मिमी आहे. परंतु, आजवर जिल्ह्यात तब्बल ९७७.३० मिमी पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या १६२.५० टक्के पाऊस झाला आहे. विशेषत: चालू महिन्यात तब्बल दमदार पाऊस होत आहे. सातत्याने अतिवृष्टी झाल्याने खरिपातील पिकांसह फळबागांना अधिकचा फटका बसला आहे. नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पडणाऱ्या पावसामुळे पंचनाम्याच्या प्रक्रियेतही अडथळे येत आहेत. पिकांचे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे जिल्ह्यातील प्रल्पांमधील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. जिल्ह्यातील ६४ पैकी तब्बल ४६ प्रकल्प तुडुंब झाले आहेत. तीन प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा झाला आहे. चार प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील आठ प्रकल्पांच्या क्षेत्रात मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या आठही प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्क्यांच्या मध्येच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. इतर प्रकल्पांमध्ये मात्र पाण्याची आवक समाधानकारक आहे. जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागाला पाण्याचा पुरवठा करणारे बहुतांश प्रकल्प समाधानकारकरित्या भरले आहेत. त्यामुळे या भागांचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे.

चौकट

मध्यम प्रकल्पांची स्थिती

प्रकल्प उपयुक्त पाणी

कल्याण गिरजा प्रकल्प जालना १०० टक्के

कल्याण मध्यम प्रकल्प जालना ९२.९६ टक्के

अप्पर दुधना प्रकल्प बदनापूर ७५.४५ टक्के

जुई मध्यम प्रकल्प भोकरदन १०० टक्के

धामना मध्यम प्रकल्प भोकरदन १०० टक्के

जीवरेखा मध्यम प्रकल्प जाफराबाद ४३.२३ टक्के

गल्हाटी मध्यम प्रकल्प अंबड १०० टक्के