शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

जालनेकरांवर पुन्हा पाणीटंचाईची वेळ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:40 IST

जायकवाडी-जालना योजनेचा पाणीपुरवठा थकित बिलापोटी थांबविण्यात आला आहे. तशा आशयाची नोटीस पालिका प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत झाला असून, अनेक भागांत नियमित पाणीपुरवठा झालेला नाही. ऐन उन्हाळ्यात जालनेकरांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे .

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जायकवाडी-जालना योजनेचा पाणीपुरवठा थकित बिलापोटी थांबविण्यात आला आहे. तशा आशयाची नोटीस पालिका प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत झाला असून, अनेक भागांत नियमित पाणीपुरवठा झालेला नाही. ऐन उन्हाळ्यात जालनेकरांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे .जायकवाडी-जालना योजनेसाठी पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी घेतले जाते. यासाठी नगरपालिकेला पैठण पाटबंधारे विभागाला नियमित पाणीपट्टी भरावी लागते. मात्र, पाणीपट्टीचा नियमित भरणा न केल्यामुळे पाटबंधारे विभागाचे नगरपालिकेकडे एक कोटी रुपये थकले आहेत. या थकबाकीपोटी पाटबंधारे विभागाने पालिकेला नोटीस बजावली आहे. मार्चअखेर सुरू असल्यामुळे चालू व मागील थकबाकीचा तात्काळ भरणा करावा, अन्यथा पाणीपुरवठा कायमचा खंडित केला जाईल, असे नोटिसीत नमूद आहे. पाटबंधारे विभागाच्या नियमित थकबाकीचा भरणा करताना पालिका प्रशासनाची दमछाक होत असताना, एकाच वेळी एक कोटी रुपयांची थकबाकी भरणार कशी, हा प्रश्न पालिका प्रशासनासमोर आहे. पाटबंधारे विभागाने दोन दिवसांपासून पाणीउपसा थांबविल्याने जुना जालन्यातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा लांबणीकर पडला आहे. शनिवारी व रविवारी कसबा, माळीपुरा, गांधीचमन, देहेडकरवाडी या भागांत काही मिनिटेच पाणीपुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांना आवठड्यातून एकदा येणारे पाणीही पुरेसे साठवता आले नाही. नूतन वसाहत भागात शुक्र्रवारपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाची चालू व एकूण थकबाकी भरण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन सुरू असल्याचे पालिकेचे अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी सांगितले.थकबाकीपोटी पाटबंधारे विभागाला दहा लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. उर्वरित रक्कम भरण्यासाठी तडजोड सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, मार्चअखेर संपूर्ण थकबाकी भरली तरच पाणीपुरवठा सुरळीत राहिली, अन्यथा जायकवाडी धरणातून जालन्यासाठी घेतले जाणारे पाणी कायमचे थांबविण्यात येईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने नोटिसीद्वारे दिला आहे.

 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी