शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

जोगलादेवी बंधाऱ्यात पाणी पोहोचले, मंगरूळला प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:48 IST

जायकवाडी पाटबंधारे विभागाने डाव्या कालव्यातून गोदावरी वरील जोगलादेवी बंधा-यासाठी सोडण्यात आलेले १३ द. ल. घ. मीटर पाण्यापैकी ८ द. ल. घ. मीटर पाणी पोहोचले असून १२ टक्के पाणीसाठा झाला

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : जायकवाडी पाटबंधारे विभागाने डाव्या कालव्यातून गोदावरी वरील जोगलादेवी बंधा-यासाठी सोडण्यात आलेले १३ द. ल. घ. मीटर पाण्यापैकी ८ द. ल. घ. मीटर पाणी पोहोचले असून १२ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर मंगरूळ बंधा-यासाठी जे पाणी सोडले ते पोहोचण्यापूर्वीच कॅनोलमधून येणारे पाणी बंद झाल्याने मंगरूळ परिसरातील शेतक-यांमध्ये नाराजी पसरली असून, पुन्हा पाणी सोडण्याची मागणी या भागातील शेतक-यांनी केली आहे.गोदावरी नदीपात्रात जोगलादेवी बंधा-या अंतर्गत जोगलादेवी साडेगाव, भोगलगाव, इंदलगाव, चिंचोली हसनापूर गोंदी, गंगा चिंचोली, पाथरवाला, बोरगाववाडी इ. १४ गावे येत असून १०८3 हेक्टर शेती सिंचनाखाली येऊन १३ गावाला पाणीपुरवठा होतो. या बंधा-याची पाणी क्षमता मोठी आहे, असे असताना पाटबंधारे खात्याने डाव्या कालव्यातून सीआरफ ५३ मधून करंजळा येथून गल्हाटी नदीतून पाणी सोडले. कॅनल ते बांधारा ९ किलोमीटरचे अंतर पार करून १३ द. ल . घ.मी. पाणी सोडले. त्यातील बंधा-यात प्रत्यक्षात केवळ ८ द. ल. घ. मीटर पाणी पोहोचले आहे. त्यातून १२ टक्के पाणीसाठा साठल्याची माहिती उपअभियंता प्रशांत देशपांडे यांनी सांगीतले.गोदावरी वरील मंगरूळ बंधा-याची क्षमता २५ द. ल. घ. मी. असून या बंधा-या अंतर्गतही १४ गावे येतात . त्यात मंगरूळ, रामसगाव, बानेगोव, राहेरी, जोगलादेवी, शेवता, भोगगाव, राजापूर, गंगावाडी, बोरगाव, मनबाई - जवळा, सौदींगाव यांचा समावेश असून, ३९६७ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. असे असताना जोगलादेवी बंधा-यातून ५ द. ल. घ. मी. पाणी सोडले जोगलादेवी ते मंगरूळ बंधारा १८ कि.मि. अंतर पाणी गोदावरी पात्रातच अडकले. ते बंधा-यात पोहोचण्यापूर्वी कॅनलचे पाणी बंद झाले त्यामुळे त्या बंधा-यात पाणीच पोहोचले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी