शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरही पाणी; जालना जिल्ह्यातील ६७०० हेक्टरवरील शेतीला अवकाळीचा तडाखा

By विजय मुंडे  | Updated: November 28, 2023 19:03 IST

पावसाची दुसऱ्या दिवशीही हजेरी : नुकसानीच्या पंचनाम्यासाठी अधिकारी, कर्मचारी बांधावर

जालना : जिल्ह्याच्या विविध भागात सोमवारी रात्री सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळीमुळे अंदाजे ६७०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरही पाणी पडले आहे. झालेल्या नुकसानीचे प्रशासकीय पातळीवरून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

पावसाअभावी यंदाचा खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला आहे. पावसाअभावी रब्बी हंगामावरही परिणाम झाला असून, उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. मोठा खर्च करून रब्बीतील पिकांची जोपासणा करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. परंतु, रविवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारे आणि गारपीट झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळपिकांनाही याचा फटका बसला. तर गारपीट झाल्यामुळे लहान- मोठी अशी तब्बल ५७ जनावरेही मयत झाली होती. तर चार घरांची पडझड या पावसात झाली होती. तर दुसऱ्या दिवशी साेमवारी रात्रीही जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस झाला. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास ६७०० हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासकीय पथकांकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

दोन हजार शेतकऱ्यांच्या तक्रारीजिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतच्या तक्रारी पिकविमा कंपनीकडे केल्या आहेत. नुकसानीनंतर ७२ तासात संबंधित शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीला माहिती देणे गरजेचे आहे. त्यासाठी १८००२००५१४२ या क्रमांकावर किंवा contactus@universalsompo.com या ई-मेलवर माहिती देणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणीअवकाळी पावसामुळे फळपिकांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कडवंची शिवारात झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी मंगळवारी सकाळी पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्यासह कृषी, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकऱ्यांची उपस्थिती होती.मागील २४ तासात झालेला पाऊस

तालुका- मिमीभोकरदन- १६.९ मिमीजाफराबाद- १५.२ मिमीजालना- १८.३ मिमीअंबड- १४.१ मिमीपरतूर- ६.० मिमीबदनापूर- १०.६घनसावंगी- ५.८मंठा- ७.२

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसJalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र