शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

ऐन गणेशोत्सवात पाण्याचे विघ्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:55 IST

ऐन सणासुदीच्या दिवसात वीज वितरण कंपनीने वीज बिल थकल्याचे कारण देत शहरातील पंपहाऊसचा वीजपुरवठा खंंडित केल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ऐन सणासुदीच्या दिवसात वीज वितरण कंपनीने वीज बिल थकल्याचे कारण देत शहरातील पंपहाऊसचा वीजपुरवठा खंंडित केल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सणासुदीच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.नवीन जालन्यासाठी घाणेवाडी तलाव तर जुना जालन्यासाठी जायकवाडी योजनेच्या स्त्रोत आहे. जायकवाडीचे पाणी मस्तगड येथील पंपहाऊसमधून जुना जालन्यात वितरित होेते. तर घाणेवाडी तलावातून शहरात येणाऱ्या पाण्यासाठी विजेची गरज लागत नाही. परंतु फिल्टरबेडमध्ये पंपाना वीजपुरवठा केला जातो. महावितरण कंपनीकडून वीजबिल थकल्याने अनेकवेळा पाणी पुरवठ्याची वीज तोडली आहे. तर शहरातील काही भाग वगळता विद्युत खांबाचा वीज पुरवठा अनेक वर्षापासून बंदच आहे. विशेष म्हणजे शहरात पाण्याची मुबलक उपलब्धता असताना वीजपुरवठा खंडित केल्याने आठवडाभरापासून दिवपसापासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प आहे. शहरातील हातपंपही नादुरुस्त असून पावसाचे पाणी न पडल्याने ते स्त्रोतही लोप पावत चालले आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठा शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना काही प्रमाणात सूट देण्यात येते, मात्र वीज वितरण कंपनी सणासुदीच्या तोंडावर नगरपालिकेची अडवणूक करत असल्याचा आरोप पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र नगरपालिका आणि महावितरणच्या कलगीतु-यात नाहक सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकात संताप आहे. यावर तातडीने तोडगा काढून शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच अंतर्गत जलवाहिनीला जागोजागी गळती लागत असल्याने काही वार्डात दहा दिवसापासून पाणीपुवरवठा झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.शहरातील अंतर्गत जलवाहिनी अनेक वर्षापासून बदलण्यात आली नाही. जीर्ण झालेल्या जलवाहिनीतून ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने पाण्याची नासाडी होत आहे परिणामी शहरातील बहुतांश वार्डात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी आहेत. गळतीमुळे पिण्यायोग्य लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याकडे न.प. ने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषद