शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

ऐन गणेशोत्सवात पाण्याचे विघ्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:55 IST

ऐन सणासुदीच्या दिवसात वीज वितरण कंपनीने वीज बिल थकल्याचे कारण देत शहरातील पंपहाऊसचा वीजपुरवठा खंंडित केल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ऐन सणासुदीच्या दिवसात वीज वितरण कंपनीने वीज बिल थकल्याचे कारण देत शहरातील पंपहाऊसचा वीजपुरवठा खंंडित केल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सणासुदीच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.नवीन जालन्यासाठी घाणेवाडी तलाव तर जुना जालन्यासाठी जायकवाडी योजनेच्या स्त्रोत आहे. जायकवाडीचे पाणी मस्तगड येथील पंपहाऊसमधून जुना जालन्यात वितरित होेते. तर घाणेवाडी तलावातून शहरात येणाऱ्या पाण्यासाठी विजेची गरज लागत नाही. परंतु फिल्टरबेडमध्ये पंपाना वीजपुरवठा केला जातो. महावितरण कंपनीकडून वीजबिल थकल्याने अनेकवेळा पाणी पुरवठ्याची वीज तोडली आहे. तर शहरातील काही भाग वगळता विद्युत खांबाचा वीज पुरवठा अनेक वर्षापासून बंदच आहे. विशेष म्हणजे शहरात पाण्याची मुबलक उपलब्धता असताना वीजपुरवठा खंडित केल्याने आठवडाभरापासून दिवपसापासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प आहे. शहरातील हातपंपही नादुरुस्त असून पावसाचे पाणी न पडल्याने ते स्त्रोतही लोप पावत चालले आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठा शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना काही प्रमाणात सूट देण्यात येते, मात्र वीज वितरण कंपनी सणासुदीच्या तोंडावर नगरपालिकेची अडवणूक करत असल्याचा आरोप पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र नगरपालिका आणि महावितरणच्या कलगीतु-यात नाहक सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकात संताप आहे. यावर तातडीने तोडगा काढून शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच अंतर्गत जलवाहिनीला जागोजागी गळती लागत असल्याने काही वार्डात दहा दिवसापासून पाणीपुवरवठा झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.शहरातील अंतर्गत जलवाहिनी अनेक वर्षापासून बदलण्यात आली नाही. जीर्ण झालेल्या जलवाहिनीतून ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने पाण्याची नासाडी होत आहे परिणामी शहरातील बहुतांश वार्डात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी आहेत. गळतीमुळे पिण्यायोग्य लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याकडे न.प. ने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषद