शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

वाहते हे पाणी..न देखवे डोळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:17 IST

सहा ते सात वर्षापूर्वी जालनेकरांना हंडाभर पाणी मिळावे म्हणून जो जिवाचा आटापिटा करावा लागला तो जालनेकर नागरिक विशेष करून महिला अद्यापही विसरलेल्या नाहीत. मात्र, आज याच्या नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबड येथून शुध्द होऊन येणारे पाणी चक्क व्हॉल्व्ह फुटल्याने वाया जात असल्याचे पाहून प्रत्येक जालनेकरांच्या डोळ्यात पाणी न आल्यासच नवल अशी अवस्था दुरूस्ती अभावी झाल्याचे वास्तव आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सहा ते सात वर्षापूर्वी जालनेकरांना हंडाभर पाणी मिळावे म्हणून जो जिवाचा आटापिटा करावा लागला तो जालनेकर नागरिक विशेष करून महिला अद्यापही विसरलेल्या नाहीत. मात्र, आज याच्या नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबड येथून शुध्द होऊन येणारे पाणी चक्क व्हॉल्व्ह फुटल्याने वाया जात असल्याचे पाहून प्रत्येक जालनेकरांच्या डोळ्यात पाणी न आल्यासच नवल अशी अवस्था दुरूस्ती अभावी झाल्याचे वास्तव आहे.जालना शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तत्कालीन आ. कैलास गोरंट्याल यांनी स्वपक्षाचे सरकार असताना त्यांच्याशी दोन हात करून पैठण जालना पाणीपुरवठा योजना खेचून आणली. त्यासाठी त्यांनी कोणकोणती शक्कल लढवून अडचणींना तोंड दिले, हे जालनेकर विसरलेले नाहीत. ही पाणीपुरवठा योजना होण्यासाठी जवळपास २५० कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. ही योजना मुळात ज्यावेळी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर होते, त्यावेळी त्यांनी जालना पालिकेत ठराव घेऊन ती पुढे रेटली. मात्र, सत्तांतर झाल्यावर माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी जोपर्यंत ही योजना पूर्ण होणार नाही, तो पर्यंत गळ्यात पुष्पहार न घालण्याची प्रतिज्ञा केली होती, आणि ती त्यांनी पूर्णही केली. भास्कर अंबेकरांप्रमोणच राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी देखील त्यावेळी ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल केली होती. एकूणच या योजनेच्या श्रेयवादावरून आजही चर्चा रंगतात ही बाब वेगळी. ही योजना व्हावी म्हणून मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चिन्नदोरे यांनी देखिल या योजनेची लोकवर्गणी भरण्यासाठी भीकमांगो आंदोलन करून औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यासाठी अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी हा लढा निशुल्क लढला होता. एकूणच आता तुम्ही म्हणाल पाणी वाया जाण्याच्या मुद्यावरून एवढा इतिहास कशासाठी सांगितला, परंतु एवढ्या कष्टाने आणलेल्या या योजनेला किरकोळ दूरूस्ती अभावी जर खीळ बसत असेल तर, ही गंभीर बाब आहे. अन्य विकास कामाच्या नावावर पालिका कोट्यवधी रूपये खर्च करत आहे. आणि आजच्या तंत्रयुगात जालना पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला जर ७०० व्यासाचा व्हॉल्व्ह मिळत नसेल तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल. संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात बुडती हे जन न देखवे डोळा... येतो कळवळा म्हणोणी. तशी अवस्था आज या गळतीची झाली आहे.आमच्याकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरूपाईपलाईन फुटल्याने त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी मोतीतलावात चर खोदून सोडले आहे. त्यामुळे मोतीतलावाची पाणीपातळी उन्हाळ्यातही कायम होती. ही पाईपलाईन दुरूस्त करण्यासाठी आमचे युध्द पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. येत्या आठ दिवसात ही दुरूस्ती हाईल अशी आशा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Waterपाणीnagaradhyakshaनगराध्यक्ष