शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वाट पाहिली पण झेडपी शिक्षक देईना; अखेर ३ दिवसांत २२ विद्यार्थ्यांनी काढला टीसी

By शिवाजी कदम | Updated: July 17, 2023 19:28 IST

केहाळ वडगाव येथे शिक्षणाची लागली वाट; हतबल विद्यार्थी अन्य शाळेत गेल्याने आठवीचा वर्ग पडला बंद

- अमोल राऊततळणी : केहाळ वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असून ही पदे भरण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून पालकांनी विद्यार्थ्यांचा दाखला काढल्यामुळे आठवीचा वर्ग बंद झाला आहे. येत्या काही दिवसांत इतरही वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे विद्यार्थ्यांना इतर शाळांची वाट धरावी लागली आहे.

मंठा तालुक्यातील जयपूर केंद्रांतर्गत केहाळ वडगाव येथे १ ते ८ पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत १०० विद्यार्थी शिक्षण घेत असताना तीन शिक्षक कार्यरत आहेत. अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी शिक्षक देण्याची वारंवार मागणी केली. मात्र, याकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संतप्त पालकांनी आपल्या मुलांच्या टीसी काढून इतरत्र शाळेत प्रवेश घेतला आहे. यामुळे विद्यार्थी संख्या घसरून ६० वर आली आहे. आठवीच्या २२ विद्यार्थ्यांनी दाखला काढून जयपूर येथील शाळेत प्रवेश घेतल्याने आठवीचा वर्ग बंद झाला आहे. ग्रामीण भागातील तळणी, किर्ला, उस्वद व जयपूर केंद्रातील शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असून पटसंख्येनुसार शिक्षक देण्याची मागणी होत आहे.

इतर शाळांमध्ये प्रवेशकेहाळ वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सातवीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आठवीच्या वर्गासाठी पात्र झाले. मात्र, अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी २२ विद्यार्थ्यांनी टीसी काढून इतरत्र प्रवेश केल्यामुळे आठवीचा वर्ग बंद झाल्याचे पालक सुरेश दवणे यांनी सांगितले.

पदवीधर शिक्षक मिळेनाकेहाळ वडगावच्या शाळेत पदवीधर शिक्षक पद रिक्त असून शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना इतरत्र प्रवेश दिल्यामुळे आठवीचा वर्ग जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वीच रिक्त पदांबाबत माहिती वरिष्ठांना दिली आहे.- ए.एम. चव्हाण, केंद्रप्रमुख, जयपूर

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाJalanaजालनाEducationशिक्षण