शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ग्रामस्थांचा दाढी-कटिंगवर बहिष्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:45 IST

जळगाव सपकाळ येथे नाभिक समाजाने दाढी-कटींगचे दर वाढवले. हे दर कमी करण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामसभा घेतली. मात्र, नाभिक समाजाने दर कमी न करण्याचा निर्णय घेतल्याने गावक-यांनी ग्रामसभा घेऊन गावात दाढी-कटिंग करण्यावर बहिष्कार टाकण्याचा आगळा वेगळा ठराव घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे नाभिक समाजाने दाढी-कटींगचे दर वाढवले. हे दर कमी करण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामसभा घेतली. मात्र, नाभिक समाजाने दर कमी न करण्याचा निर्णय घेतल्याने गावक-यांनी ग्रामसभा घेऊन गावात दाढी-कटिंग करण्यावर बहिष्कार टाकण्याचा आगळा वेगळा ठराव घेतला.जळगाव-सपकाळ येथे नाभिक समाजाची ग्रामपंचायतच्या जागेवर सलूनची नऊ दुकाने आहेत. सलून चालकांनी पूर्वी दहा व पंधरा रुपये असलेले दाढी-कटींगचे दर वाढवून पंधरा व तीस रुपये केले. दर कमी करण्यासाठी ग्रामस्थांनी दोन वेळेस ग्रामसभा घेऊन सलून चालकांना दर कमी विनंती केली. मात्र, वाढत्या महागाईमुळे दर कमी करू शकत नाही, असा पवित्रा सलून चालकांनी घेतला. त्यामुळे गावक-यांनी दर कमी न करणा-यांकडे गावातील सलून चालकांकडे दाढी-कटींग न करण्याचा निर्णय घेतला. नाभिक समाजाने ग्रामपंचायतीच्या जागेवर दुकाने थाटली आहेत. त्यासाठी कुठेही भाडे व विजेचे बिल आकारले जात नाही. त्यामुळे दर कमी ठेवावेत, अशी ग्रामस्थांची मागणी असल्याचे सरपंच मधुकर सपकाळ यांनी सांगितले. नाभिक समालातील दोघांनी ग्रामपंचायतने जागा दिल्यास कमी दरात दाढी-कटींग करण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे त्यांना दोन दुकाने सुरू करून दिल्याचे सरपंच म्हणाले. तर नाभिक संघटनेने राज्यभरात नवीन दराने दाढी-कटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दर वाढविल्याचे सलून चालक गणेश वरपे यांनी सांगितले.

टॅग्स :agitationआंदोलनgram panchayatग्राम पंचायत