शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

पाणी टंचाईचा बळी! पीक येणार नाही, कर्ज कसे फिटणार; शेतकरी दाम्पत्याने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 15:55 IST

पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी दम्पत्याची आत्महत्या : वृद्ध वडील व मुलांवर कोसळला दुःखाचा डोंगर

अंबड:  तालुक्यातील बन टाकळी शिवारातील गट नंबर-५ मधील शेतामध्ये विषारी द्रव्य प्राशन करून एका शेतकरी दंपत्याने आपली जीवन यात्रा संपवली. हृदयद्रावक अशी ही घटना आज सकाळी उघड झाली. संगीता ( ४० ) आणि अशोक नानासाहेब कानकाटे ( ४४ ) असे मृत दांपत्याचे नाव आहे. पाणी नसल्याने मोसंबी बाग जगणार नाही, यामुळे उत्पन्न होणार नसल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत दाम्पत्याने जीवन संपवल्याची माहिती नातेवाइकांनी दिली आहे. 

अंबड शहरापासून जवळच असलेल्या बनटाकळी येथील तीन एकर शेतीमध्ये कांद्याच्या पिकाचे काढणीचे काम सुरु आहे. येथे संगीता आणि आशिक कानकाटे हे दाम्पत्य सकाळीच कामासाठी आले होते. दरम्यान, काही शेतमजूरांच्या नजरेस कानकाटे यांचा मृतदेह आला. त्यांनी ही माहिती त्यांचे नातेवाईक आणि पोलिसांना दिली.  त्यांच्या पश्चात  दोन मुली, एक मुलगा आणि वृद्ध वडील आहेत. मुलगा मुंबई येथे मोलमजुरीचे काम करतो, एका मुलीचे लग्न झाले असून तिचे लग्नाचे कर्जही देणे बाकी असल्याचे, तसेच काही बचत गटाचे कर्ज त्यांच्याकडे होते. दीड एकर मोसंबीला  देण्यासाठी पाणी नसल्याने लोकांचे देणे कसे फेडायचे या  विवंचनेत ते होते असे नातेवाईकाने सांगितले.

दरम्यान, आर्थिक अडचणीला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने विषारी डाव्य प्राशन केल्याचे  नातेवाईकांनी सांगितले. अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्व नातेवाईकांनी धाव घेतली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. अंबड पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी गुन्हा दाखल.  करण्याचे प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याJalanaजालना