शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

शेतकऱ्यांवर संकट! अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू झाला आडवा, रब्बी पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 17:39 IST

मुबलक पाण्यामुळे आंबे व द्राक्ष बागा चांगल्या बहरात असतांना बदलत्या वातावरणामुळे नुकसानीची शक्यता आहे.

भोकरदन (जि.जालना) : भोकरदन शहरासह तालुक्यातील काही भागांत बुधवारी सकाळपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस बरसला आहे. तर काही भागात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तालुक्याला गेल्या चार ते पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकरी हैराण झाले आहेत. गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, मुबलक पाण्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, कांदा सिड्स, शाळू, मका आदी रब्बी पिकांची लागवड केली. सध्या ही पिके सोंगणीस आली आहे. तर काही ठिकाणी सोंगणी सुरू आहे. माल घरी येण्याची तयारी सुरू असतानाच दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेकांनी गहू, हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात केली आहे. तर अनेकांचे पीक शेतात उभे आहेत. त्यातच बुधवारी पहाटे भोकरदन शहरासह तालुक्यातील आनवा, धावडा, आडगाव, जळगाव सपकाळ, वाकडी, पोखरी, गोकुळ, आव्हाना, वालसावंगी, केदारखेडा, बरंजळा, तडेगाव, भायडी, कुकडी, विरेगाव आदी भागांत विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस झाला. तर काही भागात वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले आहे.

फळबागांना मोठा फटकाबेमोसमी पावसामुळे तालुक्यातील आंबे, द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे. मुबलक पाण्यामुळे आंबे व द्राक्ष बागा चांगल्या बहरात असतांना बदलत्या वातावरणामुळे नुकसानीची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी