शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

शेतकऱ्यांवर संकट! अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू झाला आडवा, रब्बी पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 17:39 IST

मुबलक पाण्यामुळे आंबे व द्राक्ष बागा चांगल्या बहरात असतांना बदलत्या वातावरणामुळे नुकसानीची शक्यता आहे.

भोकरदन (जि.जालना) : भोकरदन शहरासह तालुक्यातील काही भागांत बुधवारी सकाळपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस बरसला आहे. तर काही भागात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तालुक्याला गेल्या चार ते पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकरी हैराण झाले आहेत. गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, मुबलक पाण्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, कांदा सिड्स, शाळू, मका आदी रब्बी पिकांची लागवड केली. सध्या ही पिके सोंगणीस आली आहे. तर काही ठिकाणी सोंगणी सुरू आहे. माल घरी येण्याची तयारी सुरू असतानाच दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेकांनी गहू, हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात केली आहे. तर अनेकांचे पीक शेतात उभे आहेत. त्यातच बुधवारी पहाटे भोकरदन शहरासह तालुक्यातील आनवा, धावडा, आडगाव, जळगाव सपकाळ, वाकडी, पोखरी, गोकुळ, आव्हाना, वालसावंगी, केदारखेडा, बरंजळा, तडेगाव, भायडी, कुकडी, विरेगाव आदी भागांत विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस झाला. तर काही भागात वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले आहे.

फळबागांना मोठा फटकाबेमोसमी पावसामुळे तालुक्यातील आंबे, द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे. मुबलक पाण्यामुळे आंबे व द्राक्ष बागा चांगल्या बहरात असतांना बदलत्या वातावरणामुळे नुकसानीची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी