शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अस्मानी कहर; जालना जिल्ह्यात 'अवकाळी'मुळे ११५ कोटींची पिके उद्ध्वस्त !

By विजय मुंडे  | Updated: December 15, 2023 20:15 IST

जालना जिल्ह्यातील एक लाख ९१ हजार शेतकऱ्यांना फटका

जालना : वादळी वारे, गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे एक लाख १६ हजार ९४५.५२ हेक्टरवरील रब्बी पिकांसह फळपिके, बगायती क्षेत्राला फटका बसला आहे. यात जिल्ह्यातील एक लाख ९१ हजार २१९ शेतकऱ्यांचे ११५ कोटी ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल असून, या नुकसानीची भरपाई म्हणून निधीची मागणीही शासनस्तरावर केली जाणार आहे.

एकीकडे अवेळी पडलेल्या पावसामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. तर, दुसरीकडे रब्बी हंगामावर असलेली आशाही अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे मावळली आहे. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील पिकांसह रब्बीतील पिके, फळपिके व बागायती क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले होते. शासनस्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार प्रशासकीय यंत्रणेने पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील एक लाख १६ हजार ९४५.५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचा फटका एक लाख ९१ हजार २१९ शेतकऱ्यांना बसला असून, त्यांचे जवळपास ११५ कोटी ४० लाख ९४ हजार ५२५ रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपेक्षित निधीची मागणीही प्रशासकीय पातळीवरून शासनाकडे करण्यात आली आहे.

जिरायती पिके उद्धवस्तअवकाळी पावसामुळे एक लाख ४ हजार ७०१.८० हेक्टरवरील जिरायती पिके उद्ध्वस्त झाली असून, त्यात जवळपास ८८ कोटी ९९ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ १० हजार १७९ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला असून, यात २२ कोटी ९० लाखांचे नुकसान झाले आहे. तर, २०६४.४५ हेक्टरवरील बागायती क्षेत्राला फटका बसला असून, यात ३ काेटी ५० लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

आता निधीची प्रतीक्षागतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यामुळे ही स्थिती पाहता २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला जात आहे. त्यानुसार जवळपास ११५ कोटी ४० लाख रूपयांची नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. प्रशासकीय पातळीवरून मागणी नोंदविल्यानंतर मात्र शासनस्तरावरून मदत मिळणार कधी, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना