शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अस्मानी कहर; जालना जिल्ह्यात 'अवकाळी'मुळे ११५ कोटींची पिके उद्ध्वस्त !

By विजय मुंडे  | Updated: December 15, 2023 20:15 IST

जालना जिल्ह्यातील एक लाख ९१ हजार शेतकऱ्यांना फटका

जालना : वादळी वारे, गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे एक लाख १६ हजार ९४५.५२ हेक्टरवरील रब्बी पिकांसह फळपिके, बगायती क्षेत्राला फटका बसला आहे. यात जिल्ह्यातील एक लाख ९१ हजार २१९ शेतकऱ्यांचे ११५ कोटी ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल असून, या नुकसानीची भरपाई म्हणून निधीची मागणीही शासनस्तरावर केली जाणार आहे.

एकीकडे अवेळी पडलेल्या पावसामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. तर, दुसरीकडे रब्बी हंगामावर असलेली आशाही अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे मावळली आहे. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील पिकांसह रब्बीतील पिके, फळपिके व बागायती क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले होते. शासनस्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार प्रशासकीय यंत्रणेने पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील एक लाख १६ हजार ९४५.५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचा फटका एक लाख ९१ हजार २१९ शेतकऱ्यांना बसला असून, त्यांचे जवळपास ११५ कोटी ४० लाख ९४ हजार ५२५ रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपेक्षित निधीची मागणीही प्रशासकीय पातळीवरून शासनाकडे करण्यात आली आहे.

जिरायती पिके उद्धवस्तअवकाळी पावसामुळे एक लाख ४ हजार ७०१.८० हेक्टरवरील जिरायती पिके उद्ध्वस्त झाली असून, त्यात जवळपास ८८ कोटी ९९ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ १० हजार १७९ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला असून, यात २२ कोटी ९० लाखांचे नुकसान झाले आहे. तर, २०६४.४५ हेक्टरवरील बागायती क्षेत्राला फटका बसला असून, यात ३ काेटी ५० लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

आता निधीची प्रतीक्षागतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यामुळे ही स्थिती पाहता २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला जात आहे. त्यानुसार जवळपास ११५ कोटी ४० लाख रूपयांची नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. प्रशासकीय पातळीवरून मागणी नोंदविल्यानंतर मात्र शासनस्तरावरून मदत मिळणार कधी, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना