शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

दुचाकी-बस अपघातात दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:30 IST

मंठा चौफुलीजवळील रेवगाव फाट्याजवळ एका लक्झरी बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील मंठा चौफुलीजवळील रेवगाव फाट्याजवळ एका लक्झरी बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री (एक वाजेच्या सुमारास) घडली. दरम्यान, बसचालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.रविवारी सौरभ बाभळे याचा वाढदिवस होता. रात्री वाढदिवस साजरा करुन तो आणि अल्ताफ बागवान हे दोघे घराकडे जात असताना त्यांच्या दुचाकीतील (क्र.एम.एच.२०. सीई.००४३) पेट्रोल संपल्यामुळे ते येथील जांगडे पेट्रोल पंप येथून पेट्रोल टाकून घराकडे जात असताना रेवगाव फाट्याजवळ आल्यावर मंठा चौफूलीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी ट्रॅव्हल्स (क्र.एम.एच. ३८. एफ. ३९९९) ने जोराची धडक दिली. यात दुचाकी स्वार अल्ताफ अन्सार मिया बागवान (वय २३), सौरभ अशोक बाभळे ( वय २३) दोघे ( रा. ढोरपुरा गांधीनगर, जालना) हे जखमी झाले. या दोघांना जिल्हा रुग्णालयात दखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, ही बस हिंगोलीहुन पुण्याला जात होती. याबसमध्ये ३० ते ३२ प्रवाशी होते. तसेच बसचालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून, त्याच्या विरुध्द कदीम खाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रस्ता बनला अपघाताचे ठिकाणमंठा चौफुलीपासून औरंगाबादला जाण्यासाठी या रस्त्याहूनच जड वाहना जावे लागते. त्यामुळे या रस्त्यावरुन खाजगी बसचालक, ट्कचालक भरधाव वेगाने गाड्या चालवतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी अपघात होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.या अपघातामुळे गांधीनगर परिसरात सोमवारी शोकाकूल वातावरण होते.वाढदिवस ठरला अखेरचा दिवससौरभ बाभळे हा शिवाजी पुतळा येथील एका दुकानावर काम करत होता. सोमवारी २३ वा वाढदिवस असल्यामुळे रविवारी रात्रीच मित्रांनी वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. त्यामुळे रात्री साडेबारा ते एक वाजेच्यासुमारास त्यांनी वाढदिवस साजरा केला होता. तो आणि त्याच्या मित्रांनी रात्री शहरातच वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केल्यामुळे सौरभ खूप आनंदी होता असे त्यांच्या मित्रांनी सांगितले. परंतु, त्यानंतर काही मिनींटातच तो हे जग सोडून गेल्याची बातमी कळल्यावर मोठा धक्का आम्हा सर्वांना बसल्याचेही मित्र म्हणाले.बसचालकाने काढला पळहिंगोली येथून पुण्याला निघालेल्या या बसमध्ये ३० ते ३२ प्रवाशी होते. हा अपघात होताच बसचालकांने घटनास्थळावरुन पळ काढला. हा बसचालक हिंगोली येथील असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवलि आहे. दरम्यान, याचा तपास कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. एस. मोरे, कॉस्टेबल विठ्ठल खारडे हे करीत आहे.अल्ताफची इच्छा अपूर्णचअल्ताफ हा बी.कॉमच्या दुसºया वर्षात शिक्षण घेत होता. त्याला एम.बी.ए करुन उद्योजक व्हायचे होते. त्यासाठी तो नेहमी अभ्यास करायचा, असे त्यांच्या भावाने सांगितले. परंतु, त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू