शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी-बस अपघातात दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:30 IST

मंठा चौफुलीजवळील रेवगाव फाट्याजवळ एका लक्झरी बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील मंठा चौफुलीजवळील रेवगाव फाट्याजवळ एका लक्झरी बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री (एक वाजेच्या सुमारास) घडली. दरम्यान, बसचालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.रविवारी सौरभ बाभळे याचा वाढदिवस होता. रात्री वाढदिवस साजरा करुन तो आणि अल्ताफ बागवान हे दोघे घराकडे जात असताना त्यांच्या दुचाकीतील (क्र.एम.एच.२०. सीई.००४३) पेट्रोल संपल्यामुळे ते येथील जांगडे पेट्रोल पंप येथून पेट्रोल टाकून घराकडे जात असताना रेवगाव फाट्याजवळ आल्यावर मंठा चौफूलीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी ट्रॅव्हल्स (क्र.एम.एच. ३८. एफ. ३९९९) ने जोराची धडक दिली. यात दुचाकी स्वार अल्ताफ अन्सार मिया बागवान (वय २३), सौरभ अशोक बाभळे ( वय २३) दोघे ( रा. ढोरपुरा गांधीनगर, जालना) हे जखमी झाले. या दोघांना जिल्हा रुग्णालयात दखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, ही बस हिंगोलीहुन पुण्याला जात होती. याबसमध्ये ३० ते ३२ प्रवाशी होते. तसेच बसचालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून, त्याच्या विरुध्द कदीम खाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रस्ता बनला अपघाताचे ठिकाणमंठा चौफुलीपासून औरंगाबादला जाण्यासाठी या रस्त्याहूनच जड वाहना जावे लागते. त्यामुळे या रस्त्यावरुन खाजगी बसचालक, ट्कचालक भरधाव वेगाने गाड्या चालवतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी अपघात होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.या अपघातामुळे गांधीनगर परिसरात सोमवारी शोकाकूल वातावरण होते.वाढदिवस ठरला अखेरचा दिवससौरभ बाभळे हा शिवाजी पुतळा येथील एका दुकानावर काम करत होता. सोमवारी २३ वा वाढदिवस असल्यामुळे रविवारी रात्रीच मित्रांनी वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. त्यामुळे रात्री साडेबारा ते एक वाजेच्यासुमारास त्यांनी वाढदिवस साजरा केला होता. तो आणि त्याच्या मित्रांनी रात्री शहरातच वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केल्यामुळे सौरभ खूप आनंदी होता असे त्यांच्या मित्रांनी सांगितले. परंतु, त्यानंतर काही मिनींटातच तो हे जग सोडून गेल्याची बातमी कळल्यावर मोठा धक्का आम्हा सर्वांना बसल्याचेही मित्र म्हणाले.बसचालकाने काढला पळहिंगोली येथून पुण्याला निघालेल्या या बसमध्ये ३० ते ३२ प्रवाशी होते. हा अपघात होताच बसचालकांने घटनास्थळावरुन पळ काढला. हा बसचालक हिंगोली येथील असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवलि आहे. दरम्यान, याचा तपास कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. एस. मोरे, कॉस्टेबल विठ्ठल खारडे हे करीत आहे.अल्ताफची इच्छा अपूर्णचअल्ताफ हा बी.कॉमच्या दुसºया वर्षात शिक्षण घेत होता. त्याला एम.बी.ए करुन उद्योजक व्हायचे होते. त्यासाठी तो नेहमी अभ्यास करायचा, असे त्यांच्या भावाने सांगितले. परंतु, त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू