शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

वीज कडाडताच मोबाईल करा बंद; झाडांपासून राहा दूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : पावसाळा म्हटले की, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट हा एक भाग असतो. विजा चमकताना सहसा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : पावसाळा म्हटले की, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट हा एक भाग असतो. विजा चमकताना सहसा मोबाईल बंद करणे गरजेचे असून, झाडाखाली न थांबण्याची गरज आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये आकाशातील वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेषकरून गुरांच्या मृत्यूचे प्रमाण हे लक्षणीय असल्याचे दिसून येते. पाऊस आला की, रानातील गुरेही पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबतात आणि नेमकी तेथेच वीज पडते. यामुळे गुरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अनेक गुरांचे गोठे झाडाखाली असतात.

कोणाला किती मिळाली नुकसान भरपाई

n शासनाने नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या मनुष्य आणि जनावरांसाठी याआधीच तरतूद केली आहे.

n त्यानुसार वीज पडून मनुष्याचा मृत्यू झाल्यास वारसांना एक लाख रुपये, तर जनावरांच्या मालकांना ५० आणि २५ हजार रुपये अनुदान मिळते.

वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...

ज्यावेळी ढगांमध्ये विजांचा कडकडाट होतो, त्यावेळी शक्यतो कुठल्याही झाडाखाली थांबू नये. तसेच मोबाईलचा वापर न केलेलाच चांगला, अशा सूचना आहेत; परंतु याकडे अनेकजण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

कोट

राज्य सरकारने वीजरोधक यंत्रणा बसविण्यासाठी आता विशेष प्रयत्न हाती घेतले आहेत. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तो मंजूर झाल्यास मदत होणार आहे.

- डॉ. संजय लाखे-पाटील, जालना

जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा किती?

१. जालना जिल्ह्यात जवळपास १८ वेगवेगळ्या ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

२. आपत्ती निवारण विभागाकडून पावसाळा सुरू झाल्यावर सतर्कतेच्या सूचना दिल्या जातात.

३. अनेक वेळा पावसापासून बचावासाठी शेतकरी अथवा गुरे चारणारे हे झाडाखाली उभे राहतात, ते टाळले पाहिजे.