शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

जालना-अंबड महामार्ग झाडांअभावी बोडखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:41 IST

अंबड जालना या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली या मार्गावर कित्येक वर्षापासून उभे असलेल्या ८६१ झाडांची कत्तल करण्यात येत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / जामखेड : अंबड जालना या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली या मार्गावर कित्येक वर्षापासून उभे असलेल्या ८६१ झाडांची कत्तल करण्यात येत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकातून संताप व्यक्त केला आहे.आधीच जिल्ह्यात वृक्षाचे प्रमाण कमी असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. गत चार वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना नागरिकांनी केला आहे. असे असतांना सुध्दा रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली हजारो हेक्टर जमीन संपादीत करून त्यावरील मोठे वृक्ष तोडण्यात येत असल्याने परिसर भकास झाला आहे. एकीकडे शासन वृक्ष अभियान राबवून वृक्ष लागवड करावी, यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून जनजागृती करते. तर दुसरीकडे उभी असलेल्या मोठ्या वृक्षाची कत्तल करण्यात येत आहे. यामुळे शासनाचा दुप्पटीपणा दिसून येत असल्याने पर्यावरण प्रेमीतून तीव्र नाराजीचा सूर आहे.राज्य सरकार एकीकडे 'झाडे लावा' 'झाडे जगवा' असा संदेश देत आहे. तर दुसरीकडे मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात महाकाय वृक्ष तोडण्यात येत आहे. पर्यावरणाचा विचार करता या मार्गावरील वृक्षाची कत्तल न करता महाकाय वृक्षाचे संगोपन करण्याची मागणी पर्यावरण प्रेमीसह परिसरातील नागरिकातून होत आहे.दरम्यान, वृक्ष तोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे.

टॅग्स :highwayमहामार्गenvironmentवातावरण