शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जीएसटीच्या तरतुदींविरोधात व्यापारी एकवटले : कोट्यवधींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:41 IST

जीएसटी अर्थात मूल्यवर्धीत कर लागू होऊन आता चार वर्ष लोटली आहेत. ही करप्रणाली लागू करतांना केंद्र सरकारने मोठा गाजावाजा ...

जीएसटी अर्थात मूल्यवर्धीत कर लागू होऊन आता चार वर्ष लोटली आहेत. ही करप्रणाली लागू करतांना केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून ही कर प्रणाली कशी चांगली आहे. ठासून सांगितले होते. परंतु नंतर या कर प्रणालीने व्यापारी, उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. जवळपास एक हजारपेक्षा अधिक बदल या काद्यातील विविध कलमांमध्ये करण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून ही कर प्रणाली अत्यंत क्लीष्ट असल्याचे आता समोर आले आहे. हे कुठेतरी थांबावे म्हणून याआधीदेखील व्यापाऱ्यांच्या देशपातळीवरील संघटनांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच अन्य अर्थ खात्यातील वरिष्ठांशी संपर्क साधून निवेदने दिली होती. त्याचा कुठलाच उपयोग झाला नसल्याने देशपातळीवर या कायद्याविरोधात जनक्षोभ निर्माण झाला आहे.

मध्यंतरी जालन्यातील एमआयडीसी तसेच व्यापारी यांच्यावर वर्षभरात किमान ५०पेक्षा अधिक छापे पडले आहेत. त्यामुळे जीएसटी म्हटले की, सीए तसेच लेखा परीक्षक हेदेखील या कायद्यातील तरतुदींमुळे हैराण झाले आहेत. त्यांच्या संघटनांनी याचा निषेध केला होता. आज या किचकट तरतुदींविरोधात जालना जिल्ह्यातील सर्व व्यापारी सहभागी झाल्याने नेहमी वर्दळ असणाऱ्या माेंढ्यात आज शुकशुकाट होता. शहरातील सराफा, कापड तसेच अन्य लहानमोठे व्यवसायदेखील बंद होते. यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असल्याचे सांगण्यात आले. एकूणच या कायद्यातील तरतुदीत बदल न केल्यास आणखी कडक आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.

सूटसुटीत कायदा करावा

जीएसटी लागू करतांना त्याला कोणीच विरोध केला नव्हता. देश स्वतंत्र झाल्यानंतर ही कर प्रणाली बदलली आहे. त्यामुळे अनेकांनी त्याचे स्वागत करून त्यानुसार स्वत:च्या व्यवसायात बदल केले होते. परंतु नंतर या कायद्यात ज्या तरतुदी होत्या. त्यामुळे व्यापारी, उद्योजक हवालदिल झाले आहेत. त्यातच या विभागाकडून ठोस माहितीऐवजी तुटपुंजा माहितीआधारे व्यापारी, उद्योजकांच्या घरी छापे तसेच झाडाझडी घेतली जात असल्याने आम्ही आरोपी झालो आहोत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विनीत साहनी, प्रभारी अध्यक्ष व्यापारी महासंघ, जालना

ग्रामीणमध्येदेखील नाराजी

अनेक गावांमध्ये छोटे व्यावसायिक आहेत. त्यांनाही जीएसटीच्या कक्षेत आणले आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये किरकोळ विक्री तसेच मध्यम स्वरूपाचे व्यापारी आहेत. परंतु जीएसटीतील कायद्यातील बदलाने तेदेखील हैराण झाले आहेत. कसे व्यवहार करावेत आणि कशी नोद करावी, याबद्दल त्यांच्याही मनात शंका निर्माण झाली आहे. ही शंका सरकारने मध्यस्ती करून दूर करावी.

हस्तीमल बंब, अध्यक्ष, ग्रामीण व्यापारी संघटना, जालना