शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोती तलावात निघाले ट्रॅक्टरभर मृत मासे; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

By विजय मुंडे  | Updated: March 4, 2023 18:37 IST

पाणी नमुन्याची तपासणी करण्यात येणार आहे

- विजय मुंडेजालना : शहरातील मोती तलावातील अस्वच्छ पाण्यामुळे शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे. नगर पालिकेतील स्वच्छता कर्मचारी, अग्निशमन दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी बोटीद्वारे ट्रॅक्टरभर मृत मासे तलावाबाहेर काढले. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने या तलावातील पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

शहरातील मोती तलावात माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला होता. त्यानुसार मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी नगर पालिकेतील स्वच्छता विभाग व अग्निशमन विभागाच्या जवानांना मृत मासे पाण्याबाहेर काढण्याबाबत सूचित केले होते. अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, शिफ्ट इंचार्ज संदीप दराडे, नागेश घुगे, सागर गडकरी, सादिक सय्यद, रवी तायडे यांच्यासह स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार, शोएब खान व १५ कर्मचारी शनिवारी सकाळी मोती तलावावर गेले. मोती तलावातील पाण्यात तरंगणारे मृत मासे बोटीद्वारे बाहेर काढण्यात आले. जवळपास एक ते दीड ट्रॉली मृत मासे तलावाबाहेर काढून नष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तलावात आणखी मृत मासे असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे ते मासेही बाहेर काढून टाकण्याची मागणी होत आहे.

मासे खाणाऱ्यांच्या आरोग्याचे काय ?मोती तलावातील मासे पकडून त्याची विक्री केली जात होती. शिवाय अनेक नागरिक स्वत: तलावाशेजारी बसून मासे पकडून खाण्यासाठी घरी नेत होते. मोती तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याने आता त्या तलावातील मासे खाणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

पालिकेने खोदला रस्तामोती तलावात ट्रकसह इतर वाहने धुणाऱ्या वाहन चालकांची संख्या अधिक होती. या वाहनांतील ऑइल, कपडे धुताना गेलेले साबणाचे, पावडरचे घटक यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही बाब पाहता नगर पालिकेने तलावाकडे जाणारा रस्ताही खोदला आहे.

नमुने तपासणीसाठी पाठवले मोती तलावातील पाणी नमुने तपासणीसाठी औरंगाबादेतील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर माशांचा मृत्यू कशामुळे झाला? याची माहिती समोर येईल.-एस. एम. कुरमुडे, उपप्रादेशिक अधिकारी,प्रदूषण नियंत्रण महामंडळ

पाण्याचे नमुने घेतले मोती तलावातील मृत मासे काढले जात असून, प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पाणी नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई केली जाईल.- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी

कारवाई करावी मोती तलावात वाहने धुणे, कपडे धुण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. परिणामी ऑइलसह इतर घटकांमुळे तलावातील पाणी अशुद्ध होऊन माशांचा मृत्यू झाला आहे. यामुळे या तलाव परिसरात येणाऱ्या पक्ष्यांची संख्याही घटली आहे. प्रशासनाने माशांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करावी.- ज्ञानेश्वर गिराम, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीenvironmentपर्यावरणJalanaजालना