शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

शौचालय उभारणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:58 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जालना जिल्ह्याला चालू वर्षात ३६ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट दिले होते; परंतु आठ महिन्यांत केवळ १५ हजार शौचालयांचीच उभारणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जालना जिल्ह्याला चालू वर्षात ३६ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट दिले होते; परंतु आठ महिन्यांत केवळ १५ हजार शौचालयांचीच उभारणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे घनसावंगी तालुक्यातील शौचालय अनुदान वाटपाची चौकशी सुरू असून, त्यातूनही अद्याप काहीच हाती आले नसल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे.जालना जिल्हा हा सत्ताधाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातच स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री येथीलच आहेत. असे असतांना स्वच्छ भारत मिशनला केंद्र आणि राज्य सरकारने सर्वात जास्त प्राधान्याने राबविण्याचे निश्चित केले आहे. घर तेथे शौचालय उभारणीसाठी राज्य सरकारने अनुदानही देऊ केले आहे. त्यासाठी १२ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येते. हे अभियान २०१४ पासून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गेल्या चार वर्षात बेसलाईन सर्व्हेक्षणानुसार जवळपास एक लाख ७४ हजार शौचालयांची उभारणी पूर्ण झाल्याचे जिल्हा परिषदेतील स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.यंदाच्या वर्षाचे आता केवळ तीनच महिने शिल्लक आहेत. असे असतांना केवळ ५० टक्केच शौचालयांची उभारणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.त्यातही अनेक गांवामध्ये केवळ कागदावरच शौचालय उभारणी सुरू असल्याने मोठा गोंधळ सुरू आहे. घनसावंगी तालुक्यात अनुदान वाटपातही बोगसगिरी झाल्याचे समोर आले असून, त्याच्या चौकशीचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी दिले होते. परंतु ही चौकशी देखील रखडली आहे. विहिरींची चौकशी आयुक्तांकडून करण्यात आली आहे.विहीर वाटपातही गोंधळाची स्थितीमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विशेष करून परतूर तालुक्यात ज्या विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यातही तांत्रिक गडबड झाल्याने तत्कालीन गट विकास अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.एकूणच या सर्व प्रकरणांवर जिल्हा परिषदेच्या सभागृहात संबंधित विहीर खोदलेल्या परंतु अनुदान न मिळालेल्या शेतक-यांनी मोठा गोंधळ घातला होता. तसेच परतूर येथील तहसील कार्यालयासमोर चक्री उपोषणही केलेहोते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाRural Developmentग्रामीण विकासSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान