शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

शौचालय उभारणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:58 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जालना जिल्ह्याला चालू वर्षात ३६ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट दिले होते; परंतु आठ महिन्यांत केवळ १५ हजार शौचालयांचीच उभारणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जालना जिल्ह्याला चालू वर्षात ३६ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट दिले होते; परंतु आठ महिन्यांत केवळ १५ हजार शौचालयांचीच उभारणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे घनसावंगी तालुक्यातील शौचालय अनुदान वाटपाची चौकशी सुरू असून, त्यातूनही अद्याप काहीच हाती आले नसल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे.जालना जिल्हा हा सत्ताधाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातच स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री येथीलच आहेत. असे असतांना स्वच्छ भारत मिशनला केंद्र आणि राज्य सरकारने सर्वात जास्त प्राधान्याने राबविण्याचे निश्चित केले आहे. घर तेथे शौचालय उभारणीसाठी राज्य सरकारने अनुदानही देऊ केले आहे. त्यासाठी १२ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येते. हे अभियान २०१४ पासून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गेल्या चार वर्षात बेसलाईन सर्व्हेक्षणानुसार जवळपास एक लाख ७४ हजार शौचालयांची उभारणी पूर्ण झाल्याचे जिल्हा परिषदेतील स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.यंदाच्या वर्षाचे आता केवळ तीनच महिने शिल्लक आहेत. असे असतांना केवळ ५० टक्केच शौचालयांची उभारणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.त्यातही अनेक गांवामध्ये केवळ कागदावरच शौचालय उभारणी सुरू असल्याने मोठा गोंधळ सुरू आहे. घनसावंगी तालुक्यात अनुदान वाटपातही बोगसगिरी झाल्याचे समोर आले असून, त्याच्या चौकशीचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी दिले होते. परंतु ही चौकशी देखील रखडली आहे. विहिरींची चौकशी आयुक्तांकडून करण्यात आली आहे.विहीर वाटपातही गोंधळाची स्थितीमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विशेष करून परतूर तालुक्यात ज्या विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यातही तांत्रिक गडबड झाल्याने तत्कालीन गट विकास अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.एकूणच या सर्व प्रकरणांवर जिल्हा परिषदेच्या सभागृहात संबंधित विहीर खोदलेल्या परंतु अनुदान न मिळालेल्या शेतक-यांनी मोठा गोंधळ घातला होता. तसेच परतूर येथील तहसील कार्यालयासमोर चक्री उपोषणही केलेहोते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाRural Developmentग्रामीण विकासSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान