शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

शौचालय उभारणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:58 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जालना जिल्ह्याला चालू वर्षात ३६ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट दिले होते; परंतु आठ महिन्यांत केवळ १५ हजार शौचालयांचीच उभारणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जालना जिल्ह्याला चालू वर्षात ३६ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट दिले होते; परंतु आठ महिन्यांत केवळ १५ हजार शौचालयांचीच उभारणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे घनसावंगी तालुक्यातील शौचालय अनुदान वाटपाची चौकशी सुरू असून, त्यातूनही अद्याप काहीच हाती आले नसल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे.जालना जिल्हा हा सत्ताधाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातच स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री येथीलच आहेत. असे असतांना स्वच्छ भारत मिशनला केंद्र आणि राज्य सरकारने सर्वात जास्त प्राधान्याने राबविण्याचे निश्चित केले आहे. घर तेथे शौचालय उभारणीसाठी राज्य सरकारने अनुदानही देऊ केले आहे. त्यासाठी १२ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येते. हे अभियान २०१४ पासून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गेल्या चार वर्षात बेसलाईन सर्व्हेक्षणानुसार जवळपास एक लाख ७४ हजार शौचालयांची उभारणी पूर्ण झाल्याचे जिल्हा परिषदेतील स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.यंदाच्या वर्षाचे आता केवळ तीनच महिने शिल्लक आहेत. असे असतांना केवळ ५० टक्केच शौचालयांची उभारणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.त्यातही अनेक गांवामध्ये केवळ कागदावरच शौचालय उभारणी सुरू असल्याने मोठा गोंधळ सुरू आहे. घनसावंगी तालुक्यात अनुदान वाटपातही बोगसगिरी झाल्याचे समोर आले असून, त्याच्या चौकशीचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी दिले होते. परंतु ही चौकशी देखील रखडली आहे. विहिरींची चौकशी आयुक्तांकडून करण्यात आली आहे.विहीर वाटपातही गोंधळाची स्थितीमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विशेष करून परतूर तालुक्यात ज्या विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यातही तांत्रिक गडबड झाल्याने तत्कालीन गट विकास अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.एकूणच या सर्व प्रकरणांवर जिल्हा परिषदेच्या सभागृहात संबंधित विहीर खोदलेल्या परंतु अनुदान न मिळालेल्या शेतक-यांनी मोठा गोंधळ घातला होता. तसेच परतूर येथील तहसील कार्यालयासमोर चक्री उपोषणही केलेहोते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाRural Developmentग्रामीण विकासSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान