शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आज लोकसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:44 IST

प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून तळपत्या उन्हातही प्रचाराने वेग घेतला होता. काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मतदार संघात प्रचारसभा घेऊन वातावरण तापवले होते. या प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.जालना लोकसभा मतदार संघात कधी नव्हे एवढी चुरस या निवडणुकीत दिसून आली. सलग पाचव्यांदा खासदारकीची निवडणूक लढविणारे रावसाहेब दानवे यांच्या विरूद्ध काँग्रेसमधून कोणाला उमेदवारी द्यायची यावरूनच गेले तीन महिने गोंधळाचे वातावरण होते. काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी दानवेंच्या विरूद्ध दोन हात करण्यास असमर्थता दर्शविली. शेवटी पुन्हा एकदा काँग्रेसने २०१४ साली दानवेंना टक्कर देणाºया विलास औताडे यांनाच रिंगणात उतरविले. २०१४ मध्ये मोदी लाटेतही औताडे यांना ४ लाख ८५ हजार मते मिळाली होती. यावेळी अशी कुठलीच लाट नसल्याने औताडे हे दानवेंना चांगली टक्कर देतील अशी अपेक्षा आहे.वंचित आघाडीचे डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे दोन वेळेस जालन्यात येऊन गेले. आंबेडकरांप्रमाणेच आ. बच्चू कडू, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अल्पसंख्याक समितीचे हाजी अरफाज, केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम भाईजान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप महिला मोर्चाच्या माधवी नाईक यांच्यासह अनेक दिग्गजांनी जालना, भोकरदन, पैठण, फुलंब्री, बदनापूर, सिल्लोड येथे या नेत्यांनी हजेरी लावून आपल्याच पक्षाला विजयी करण्याचे आवाहन करून एकमेकांवर टीकेची झोड उठवून उन्हाळ्यात आणखी राजकीय वातावरण तप्त केले होते.दरम्यान, शनिवारी जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मतदारांशी वेगवेगळ््या प्रकारे संपर्क साधून निवडून देण्याचे आवाहन केले.निवडणूक यंत्रणा सज्जजालना लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची आवश्यक ती तयारी पूर्ण झाली आहे. इव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन पूर्णपणे सील करण्यात आल्या असून, त्यांचा सांभाळ हा अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत केला जात आहे. या निवडणुकीत जवळपास ८ हजार कर्मचारी लागणार असून, दोन हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येत आहे. - राजीव नंदकर

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालना