शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आजपासून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:57 IST

रविवार सकाळपासून जालना शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंबड येथील मत्स्योदरी देवी मंदिराजवळ रस्त्याचे काम सुरु असताना फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, रविवार सकाळपासून जालना शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.अंबड येथे रस्त्याचे काम करण्यासाठी संबंधित कंत्राटदार एजन्सीमार्फत पोकलेनव्दारे रस्ते खोदण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम करत असताना अंबड येथील जलशुध्दीकरण केंद्रातून जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पोकलेनचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनीला मोठे भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. जलवाहिनीला पडलेल्या या भगदाडामुळे जालना शहरातील पाणीपुरवठा थांबवण्यात आला.पाणीपुरवठा विभागाचे सभापती रमेश गौरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली न. प. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजेश बगळे, कंत्राटदार एजन्सीचे कामगारांनी तातडीने अंबड येथे धाव घेऊन फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करुन अंबड येथील जलशुध्दीकरण केंद्रातून जालना शहरासाठी पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. रविवारी सकाळपासून शहरातील विविध भागांसाठी पाणी वितरीत करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी सांगितले.दरम्यान, रस्त्याचे काम करणा-या कंत्राटदार एजन्सीला सोमवारी जालना पालिकेतर्फे नोटीस बजावण्यात येणार असून, पाण्याची झालेली नासाडी तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई करुन घेण्यात येणार असल्याचे देखील गोरंट्यांल यांनी सांगितले.या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले आहे.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदWaterपाणीnagaradhyakshaनगराध्यक्ष