शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

यंदाही मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:48 AM

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर झाला. निकालात अपेक्षेप्रमाणे मुलींची बाजी मारली आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ८७.४५ टक्के इतका लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर झाला. निकालात अपेक्षेप्रमाणे मुलींची बाजी मारली आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ८७.४५ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट झाली आहे. विभागात जिल्हा चौथ्या क्रमांकावर आला आहे.फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध केंद्रांवर कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्य शाखेच्या २७ हजार २३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी २७ हजार १८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.जाहीर झालेल्या आॅनलाइन निकालात २३ हजार ७७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांची संख्या १४ हजार ७९२ तर मुलींची संख्या ८९८० इतकी आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.३५ असून मुलींचा निकाल ९१.१७ टक्के इतका लागला आहे. निकाल कसा लागेल या भीतीने सकाळपासूनच विद्यार्थ्यांत धाकधूक सुरू होती. निकालाची वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. दुपारी एकच्या सुमारास शहरातील विविध इंटरनेट कॅफेवर गर्दी केली होती. बहुतांश विद्यार्थ्यांनी मोबाईलवर निकाल पाहण्यास पसंती दिली. निकाल कळताच विद्यार्थ्यांनी नातेवाइकांसह मित्र-मैत्रिणींना संपर्क करून माहिती दिली. तसेच एकमेकांचे अभिनंदन केले. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी नेहमीप्रमाणे उज्ज्वल निकालाची परंपरा कायम आहे.भोकरदन तालुक्याचा निकाल ९३ टक्केभोकरदन : तालुक्यात बारावीचा निकाल ९३़७२ टक्के लागला आहे़ १२ वीच्या शालांत परीक्षेसाठी तालुक्यातून आठ हजार ३०७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ७ हजार ७८५ विद्यार्थी उर्त्तीण झाले आहेत. भोकरदनच्या शिवाजी विद्यालयाचा निकाल ९७़५२ टक्के, रामेश्वर महाविद्यालयाचा निकाल ९० टक्के, शारदा विद्या मंदिर वरूडचा निकाल ९६़७७ टक्के, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय हसनाबादचा ९८़२६, छत्रपती संंभाजी विद्यालय तांदुळवाडीचा १०० टक्के, मोरेश्वर विद्यालय राजूरचा ९२़५० टक्के, प्रियदर्शनी कन्या विद्यालय भोकरदनचा ८६़६६ टक्के, अलहुदा उर्दू हायस्कूलचा ९५़९६ टक्के, सत्यशोधक माध्यमिक विद्यालयाचा ९८़८९ टक्के, न्यू हायस्कूल भोकरदनचा ९२़०२ टक्के, असा निकाल लागला आहे. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे, नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, गटशिक्षण अधिकारी दिलीप शहागडकर यांनी कौतुक केले आहे.जाफराबाद तालुक्यातील महाविद्यालयांनी राखली निकालाची परंपराजाफराबाद : जाफराबाद तालुक्याचा एकूण निकाल ८८.१८ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी यश संपादन केले. तालुक्यातील ज्ञानसागर विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के, कला शाखेचा ८४ टक्के, ज्ञानसागर विद्यालय सिपोराअंभोराचा एकूण निकाल ९०.७६ टक्के, समर्थ जूनियर कॉलेजचा ९४.०० टक्के, राजे संभाजी विद्यालय जवखेडचा ९७.४५ ,जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय टेंभूर्णीचा ९५.०० टक्के, जिजाऊ कॉलेज वरुड बु ८८.१८ टक्के, जिजाऊ कॉलेज जाफराबादचा ८६.९५ टक्के, स्वामी विवेकानंद कॉलेज ८७.०१ , नवभारत कॉलेज टेंभुर्णीचा ८१.७१ टक्के, शिवाजी कॉलेज भारज ७९.७३ , गुरुदेव कॉलेज जानेफळ ९२.३७, जयभावनी विद्या मंदिर देळेगव्हाण ९७.५२ ,आयशा उर्दू हायस्कूल जाफराबादचा ६९.८१ , जिजामाता विद्यालय निमखेडा ६८.४२ , अभिजीत विद्यालय खासगाव ५४.५४ , जाणता राजा विद्यालय अकोला देव ९३.१८ , कै. मारोतराव देशमुख विद्यालय टेंभूर्णी ८५.४८ , स्वामी विवेकानंद विद्यालय बुटखेडा ९३.३३, दीपभारती विद्यालय माहोरा ९१.३० टक्के, सिध्दार्थ महाविद्यालय जाफराबादचा ९५ टक्के तर भारतमाता महाविद्यालय वरुड बुद्रूक ८७ टक्के निकाल लागला आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८Education Sectorशिक्षण क्षेत्र