शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा जालन्याचे पाणी, आता वॉटरग्रीडसाठी सरकारशी टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:31 IST

पाणी आणि कैलास गोरंट्याल हे जणू काही समीकरणच बनले आहे. जालन्यातील पाणी प्रश्नावर त्यांनी २०११ मध्ये स्वपक्षाचे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर त्या योजनेला निधी मिळावा म्हणून उपोषण केले होते

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाणी आणि कैलास गोरंट्याल हे जणू काही समीकरणच बनले आहे. जालन्यातील पाणी प्रश्नावर त्यांनी २०११ मध्ये स्वपक्षाचे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर त्या योजनेला निधी मिळावा म्हणून उपोषण केले होते. आणि आता ते पुन्हा निवडन आल्यावर आणि योगायोगाने पुन्हा ते ज्या पक्षात आहेत, त्या घटक पक्षाचे म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार आहे.असे असतानाही त्यांनी भाजपचे माजी मंत्री आणि आता आमदार असलेले बबनराव लोणीकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मराठवाडा वॉटरग्रीडचा मुद्दा थेट विधानसभेत मांडून अर्थमंत्री अजित पवार यांनाच थेट सवाल करून यासाठी वाढीव निधीची तरतूद करण्याचा मुद्दा उपस्थित करून सर्वांना अचंबित केले आहे. सध्या जालन्याचे दोन्ही आमदार चर्चेत असून, त्यात कैलास गोरंट्याल आणि राज्याच्या आरोग्य मंत्रीपदाची धुरा सांभाळणारे राजेश टोपे यांचा त्यात समावेश आहे.फडणवीस सरकारच्या काळात मराठवाडा वॉटरग्रीड योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यासाठी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी यात जीव ओतून परिश्रम घेतले. देशातील गुजरात, तेलंगणासह त्यांनी परदेशातील अनेक देशातील पाणीपुरवठा योजनांना भेटी देऊन त्यांचा अभ्यास केला. तसेच इस्त्राईलच्या एका कंपनीला मराठवाडा वॉटरग्रीडसाठीचा आराखडा तयार करण्याचे सूचनाही देल्या होत्या. त्या कंपनीने मराठवाड्यातील सर्व धरणांना एकमेकांना जोडून त्यातून ज्या भागात पाणी टंचाई आहे, त्या भागात ते पाणी वळविण्यात येणार होते. त्यासाठी मोठ्या व्यासाच्या जलवाहिनी टाकून ही योजना सुरू करण्याचा मनोदय होता. त्यासाठी दोन हजार कोटी रूपयांची गरज होती. असे असतांना नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी केवळ २०० कोटी रूपयांचा निधी राखून ठेवला. या मुद्यावर लोणीकरांपेक्षाही आ. गोरंट्याल यांनी प्रभावी मुद्दे मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.या गोरंट्याल यांच्या खास शैलीतील प्रश्न उपस्थित करण्याच्या मुद्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही चक्रावले. पाण्याचा मुद्दा असल्यावर गोरंट्याल हे सरकार कोणाचे आहे, हे पाहत नाही, तर जनतेला पाणी मिळाले पाहिजे असे त्यांनी ठासून सांगितले.अंतर्गतकडेही लक्ष घालावेजालना ते पैठण योजना पूर्णत्वास नेण्यासाठी जालन्यातील माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांनीही मोठी लढाई लढली. याचवेळी स्वाभिमानी संघटनेचे नेते साईनाथ चिन्नादोरे यांनी या योजनेसाठी लोकांकडून वर्गणी करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यातच त्यावेळी देखील आ. असलेल्या गोरंट्याल यांनी या योजनेसाठी त्यांचे सर्वस्व पणाला लावले होते.त्यातून ही योजना पूर्ण झाली. पंरतु त्यानंतर खा. रावसाहेब दानवे यांच्या पुढकाराने शहरातील गल्ली-बोळांमध्ये पाणी पोहोचविण्यासाठी अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी १३५ कोटी रूपये मंजूर केले होते. त्यातील शंभर कोटी रूपयांचे बिल हे संबंधित कंत्राटदाराला पालिकेने अदाही केले आहे. परंतु आजही या योजनेतून उभारण्यात येणारे जलकुंभ रखडले आहेत. तसेच या योजनेतून करण्यात आलेल्या योजनेचे थर्ड पार्टी आॅडिट केल्यास बराच गोंधळ समोर यईल. यासाठी आता आ. कैलास गोरंट्याल यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :MLAआमदारWaterपाणीRajesh Topeराजेश टोपे