शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

ट्युशनला जातो सांगून घराबाहेर पडलेली तीन शाळकरी मुलं बेपत्ता

By विजय मुंडे  | Updated: August 16, 2023 19:31 IST

पोलिस पथकासह पालक, नातेवाईक शोध कार्यासाठी विविध मार्गावर

जालना : ट्युशनला जाण्याच्या बहान्याने मंगळवारी सकाळी घराबाहेर पडलेली जालना शहरातील तीन शाळकरी मुलं बेपत्ता झाली आहेत. या प्रकरणात कदीम पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिस यंत्रणा तपास करीत आहे. शिवाय त्या शाळकरी मुलांच्या शोधासाठी पालकांसह नातेवाईकही विविध मार्गावर फिरत आहेत.

अंकित प्रकाश जाधव (वय-१५ रा. सिचंन वसाहत, ईदगा मैदानाच्या मागे जुना जालना), स्वराज संतोष मापारी (वय-१४ रा. घायाळ नगर, जुना जालना) व हर्षद अशोक देवकर (वय-१४ रा. कसबा, गांधीचमन, जुना जालना) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. पाटबंधारे विभागात कामाला असलेले प्रकाश जाधव हे मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदनासाठी निघाले होते. त्यावेळी स्वराज मापारी व हर्षद देवकर हे दोघे त्यांच्या घरी आले. त्यांनी त्यांचा मुलगा अंकित याला हाक दिली. झोपेत असलेल्या अंकितला त्याच्या वडिलांनी उठविले आणि ते झेंडावंदनासाठी गेले. कार्यक्रमानंतर दुचाकीच्या डिक्कीतील हेडफोन मित्राला देण्यासाठी त्यांनी कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यावेळी दुचाकी व अंकित घरी नसल्याचे समजले. घरातील दरवाजाच्या हॅण्डलला एक चिठ्ठी आढळली. त्यानंतर जाधव यांनी मापारी, देवकर कुटुंबाशी संपर्क साधला असता ते दोघे ट्युशनसाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाल्याचे समजते. ते तिघे बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी सर्वत्र शोध सुरू केला. सायंकाळपर्यंत त्या तिघांचा शोध न लागल्याने या प्रकरणात प्रकाश जाधव यांनी कदीम ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्या तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पत्ता शोधण्याचा प्रयत्न करू नकाअंकित जाधव याने घर सोडण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. मम्मी, पप्पा आणि मयूर तुम्ही हे लेटर वाचेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. मी एवढा माेठा झालो नाही की मी असे डिसिजन घ्यावे. मी घर सोडून जात आहे. पत्ता शोधण्याचा प्रयत्न करू नका वगैरे मजकूर चिठ्ठीत आहे. ही चिठ्ठी हाती लागल्यानेच ते तिघे मित्र घरातून निघून गेल्याचे समोर आले.

सोशल मीडियातून आवाहनत्या तिन्ही शाळकरी मुलांचा पोलिस दलाच्या वतीने विविध माध्यमातून शोध घेतला जात आहे. त्याशिवाय फेसबूक, व्हाटस्ॲप आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्या तिन्ही मुलांच्या शोधासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभावउद्योगनगरी, बियाणांची राजधानी म्हणून जालना शहराची ओळख. परंतु, जालना शहरातील प्रमुख मार्गावर, चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आहे. दुचाकी चोरी, वाहन चोरीसह घरफोड्यांच्या घटना सतत होतात. परंतु, सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरटेही सापडत नाहीत. शहरातील प्रमुख मार्गावर, चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असते तर ते शाळकरी मुलं कोणत्या मार्गावरून गेले याचा शोध घेण्यास पोलिसांनाच मदत झाली असती. परंतु, प्रमुख मार्गावरच सीसीटीव्ही नसल्याने शोध कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाKidnappingअपहरण