शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ट्युशनला जातो सांगून घराबाहेर पडलेली तीन शाळकरी मुलं बेपत्ता

By विजय मुंडे  | Updated: August 16, 2023 19:31 IST

पोलिस पथकासह पालक, नातेवाईक शोध कार्यासाठी विविध मार्गावर

जालना : ट्युशनला जाण्याच्या बहान्याने मंगळवारी सकाळी घराबाहेर पडलेली जालना शहरातील तीन शाळकरी मुलं बेपत्ता झाली आहेत. या प्रकरणात कदीम पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिस यंत्रणा तपास करीत आहे. शिवाय त्या शाळकरी मुलांच्या शोधासाठी पालकांसह नातेवाईकही विविध मार्गावर फिरत आहेत.

अंकित प्रकाश जाधव (वय-१५ रा. सिचंन वसाहत, ईदगा मैदानाच्या मागे जुना जालना), स्वराज संतोष मापारी (वय-१४ रा. घायाळ नगर, जुना जालना) व हर्षद अशोक देवकर (वय-१४ रा. कसबा, गांधीचमन, जुना जालना) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. पाटबंधारे विभागात कामाला असलेले प्रकाश जाधव हे मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदनासाठी निघाले होते. त्यावेळी स्वराज मापारी व हर्षद देवकर हे दोघे त्यांच्या घरी आले. त्यांनी त्यांचा मुलगा अंकित याला हाक दिली. झोपेत असलेल्या अंकितला त्याच्या वडिलांनी उठविले आणि ते झेंडावंदनासाठी गेले. कार्यक्रमानंतर दुचाकीच्या डिक्कीतील हेडफोन मित्राला देण्यासाठी त्यांनी कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यावेळी दुचाकी व अंकित घरी नसल्याचे समजले. घरातील दरवाजाच्या हॅण्डलला एक चिठ्ठी आढळली. त्यानंतर जाधव यांनी मापारी, देवकर कुटुंबाशी संपर्क साधला असता ते दोघे ट्युशनसाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाल्याचे समजते. ते तिघे बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी सर्वत्र शोध सुरू केला. सायंकाळपर्यंत त्या तिघांचा शोध न लागल्याने या प्रकरणात प्रकाश जाधव यांनी कदीम ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्या तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पत्ता शोधण्याचा प्रयत्न करू नकाअंकित जाधव याने घर सोडण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. मम्मी, पप्पा आणि मयूर तुम्ही हे लेटर वाचेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. मी एवढा माेठा झालो नाही की मी असे डिसिजन घ्यावे. मी घर सोडून जात आहे. पत्ता शोधण्याचा प्रयत्न करू नका वगैरे मजकूर चिठ्ठीत आहे. ही चिठ्ठी हाती लागल्यानेच ते तिघे मित्र घरातून निघून गेल्याचे समोर आले.

सोशल मीडियातून आवाहनत्या तिन्ही शाळकरी मुलांचा पोलिस दलाच्या वतीने विविध माध्यमातून शोध घेतला जात आहे. त्याशिवाय फेसबूक, व्हाटस्ॲप आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्या तिन्ही मुलांच्या शोधासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभावउद्योगनगरी, बियाणांची राजधानी म्हणून जालना शहराची ओळख. परंतु, जालना शहरातील प्रमुख मार्गावर, चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आहे. दुचाकी चोरी, वाहन चोरीसह घरफोड्यांच्या घटना सतत होतात. परंतु, सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरटेही सापडत नाहीत. शहरातील प्रमुख मार्गावर, चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असते तर ते शाळकरी मुलं कोणत्या मार्गावरून गेले याचा शोध घेण्यास पोलिसांनाच मदत झाली असती. परंतु, प्रमुख मार्गावरच सीसीटीव्ही नसल्याने शोध कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाKidnappingअपहरण