शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

२३ हजार जण तापाने फणफणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:10 IST

जिल्ह्यात २३ हजार रुग्ण तापाने फणफणले असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी गावंडे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हाभरात साथ रोगाने थैमान घातले असल्याने नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. जिल्ह्यात २३ हजार रुग्ण तापाने फणफणले असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी गावंडे यांनी दिली. तसेच ३ रुग्णांना मलेरिया तर ८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.सध्या पावसाळ््याचे दिवस सुरु आहे. पावसाळ््यात पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. डासांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिक आजारी पडत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे.खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी दिसत आहे. सर्दी, खोकला, हातपाय दुखणे, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. विशेषत: ग्रामीण भागात रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात २३ हजार १७ नागरिक तापाने फणफणले आहे. तर आॅगस्ट महिन्यात २७ हजार ६९६ रुग्णांना ताप असल्याचे सांगण्यात आले. या सर्व रुग्णांचे रक्त जल नमुने तपासण्यात आले. यातील ३ जणांना मलेरिया तर ११ रुग्णांना डेंग्यू झाल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी दिली.प्रशासनाने गावात स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश दिले असतानाही ग्रामपंचायत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे गावातील नाल्या व डबक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले दिसत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागात आजाराचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूMedicalवैद्यकीयgram panchayatग्राम पंचायत