शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कर्मचाऱ्यांना कामात हलगर्जीपणा करणे भोवले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:50 IST

शालेय पोषण आहार योजनेच्या कामात हलगर्जीपणा आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या पथकाने एक केंद्रप्रमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शालेय पोषण आहार योजनेच्या कामात हलगर्जीपणा, रेकॉर्ड अद्यावत न करणे, उशिरा येणे, महिन्याभरापासून गैरहजर राहणे या सर्व बाबी आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या पथकाने एक केंद्रप्रमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई केली आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा या सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे. कामात हलगर्जीपणा, सतत गैरहजर राहणे व रेकॉर्ड मेन्टेन न करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उचला आहे. यासाठी त्यांनी महिनाभरापूर्वीच आठ अधिकाºयांचे पथक स्थापन केले आहे. हे पथक दर आठवड्याला जिल्हाभरातील जि. प. शाळा, आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायतींचा कारभार, रोजगार हमीची कामे, या सर्व बाबी तपासत आहे. या पथकाने आतापर्यंत १३८ ग्रामसेवक, १२ वैद्यकिय अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई केली आहे. दरम्यान, या पथकानेच जिल्हाभरातील काही शाळांची पाहणी केली असता, काही शाळांमध्ये अस्वच्छता, पोषण आहार गॅस ऐवजी लाकडाने शिजवणे, गैरहजर असणे अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. यात १ केंद्रपमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अरोरा यांनी दिली. यापुढेही अशा कामचुकार कर्मचा-यांवर जास्तीचे लक्ष ठेवण्यात येणार आहे.कुठे काय आढळले ?घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील अर्जुननगर शाळेत शिक्षक उशारा आल्यामुळे त्यांची तात्पुरती वेतनवाढ बंद करण्यात आली आहे.परतूर तालुक्यातील सोयंजना येथील शाळेत शालेय पोषण आहार योजनेची योग्यरीत्या अंमलबजावणी न करणे, रेकॉर्ड अद्ययावत न करणे.परतूर तालुक्यातीलच वाटूर केंद्राचे केंद्रप्रमुख मागील महिन्याभरापासून गैरहजर असल्याचे आढळून आले.जाफराबाद तालुक्यातील शिरोळा येथील मुख्याध्यापकांनी पोषण आहार शिजवण्यासाठी लाकडाचा उपयोग केला. यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदEmployeeकर्मचारीgovernment schemeसरकारी योजना