शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

तिसरे अपत्य प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:47 IST

नगराध्यक्षा संगीता देवीदास कुचे यांना (कट आॅफ डेट) नंतर तिसरे अपत्य असल्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : नगराध्यक्षा संगीता देवीदास कुचे यांना (कट आॅफ डेट) नंतर तिसरे अपत्य असल्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी राज्याचे नगरविकास खात्याचे सचिव, जालना जिल्हाधिकारी, अंबड नगराध्यक्षा व नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशा चार जणांना आपले म्हणणे आठ आठवड्यांत मांडण्याचे आदेश दिले आहेत.नगराध्यक्षांना तिसरे अपत्य असल्याने त्यांचे पद रद्द करण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने संपूर्ण तालुक्यात याप्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली आहे. काँग्रेसच्या मंगल प्रकाश नारायणकर यांनी नगराध्यक्षा संगीता कुचे यांना ‘कट आॅफ डेट’नंतर तिसरे अपत्य असल्याने कुचे यांचे पद रद्द करावे, अशी तक्रार ८ जून २०१७ रोजी जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.मात्र, याप्रकरणी सुनावणी करण्यास व निकाल देण्यास जिल्हाधिका-यांनी राजकीय दबावामुळे संपूर्ण एक वर्षभर विलंब केला. या प्रकरणी जिल्हाधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत नारायणकर यांनी सदरील प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती.दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने जालना जिल्हाधिका-यांनी नैसर्गिक न्याय तत्त्वावर सदरील प्रकरणी सहा महिन्यांमध्ये निकाल द्यावा, असा आदेश दिला. मात्र, सहा महिने संपण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना जिल्हाधिका-यांनी राज्य शासनाकडून आलेल्या पत्राआधारे सदरील प्रकरण राज्य शासनाकडे चालवावे, असा निकाल दिला. याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. किशोर राऊत यांनी याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून निर्णय देण्याची विनंती विचारात न घेता सदरील प्रकरण निकाली काढले. जिल्हाधिका-यांच्या या निर्णयाविरोधात नारायणकर यांनी अ‍ॅड. संभाजी टोपे यांच्यांमार्फत उच्च न्यायालयात अपील दाखल करून निकाल देण्याची विनंती केली. यावेळी नारायणकर यांनी उच्च न्यायालयात आपले म्हणणे मांडताना शासन निर्णयानुसार जनतेमधून निवडून आलेला नगराध्यक्ष हा नगरपालिकेचा सदस्य मानला जाईल. तसेच सदस्यांना लागू होणारे अपात्रतेचे सर्व नियम सदस्य या नात्याने नगराध्यक्षांनाही लागू असल्याची बाब उच्च न्यायालयासमोर मांडली. याविषयी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालास नारायणकर यांनी अ‍ॅड. तौर यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर न्यायालयाने संबंधितांना म्हणणे मांडण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.आठ आठवड्यात म्हणणे मांडण्यासाठी नोटीसया याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. ए. के. सिक्री व न्या. अब्दुल नझीर यांच्या बेंचसमोर झालेल्या सुनावणीत अ‍ॅड. तौर यांनी नगराध्यक्षांना नगरसेवकांचे अपात्रतेचे नियम असल्याची बाजू मांडली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास खात्याचे सचिव, जालना जिल्हाधिकारी, नगराध्यक्षा संगीता कुचे, येथील नगरपालिकेच्या मुख्याधिका-यांना याविषयी आठ आठवड्यात म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले असून संबधीत सर्वांना तशा पध्दतीच्या नोटिसा बजावल्या असल्याची माहिती याचिकाकर्ते मंगल प्रकाश नारायणकर यांनी दिली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयnagaradhyakshaनगराध्यक्ष