शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

तिसऱ्या दिवशीही मजुरांचे कामासाठी आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:35 IST

शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद जालना येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने परतूर मंठा घनसावंगी तालुक्यातील मनरेगाची कामे मागणी केलेल्या गावात दुष्काळ असल्याने तात्काळ मनरेगाची कामे सुरु करून मनरेगा मजुरांना कामे द्या व कायद्यानुसार बेरोजगार भत्ता वाटप करा मागणीसाठी ४ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद जालना येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असतानाही प्रशासनाला जाग येईना.मागील तीन ते चार महिन्यांपासून १३ हजाराच्या वर मजूर व शेतकरी मनरेगाच्या कामासाठी सतत संघर्ष करीत आहे. परंतु जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी हे मजुरांना सहकार्य करत नाहीत ते केवळ जेसीबी मशिनला सहकार्य करत आहेत. जलयुक्तच्या नावाखाली जिल्हाधिकारी हे जलयुक्तचे चेरमन आहेत. जिथे मजुरांनी कामाची मागणी केली आहे, तिथे ते काम मजुराला द्यावे परंतु ते काम जेसीबी मशिनला दिले आहे. माव(पाटोदा ), लिखित पिंप्री, ता. परतूर यासह अशीच परिस्थिती जिल्हाभर आहे. मजूर काम मिळविण्यासाठी सतत संघर्ष करीत आहे. त्यांना काम नाही. परंतु गुत्तेदाराच्या जेसीबी मशिनला त्वरीत काम मिळते. या सर्व अन्यायाविरुद्ध मजुर सोमवारपासून आंदोलन करत आहेत.या आंदोलनात आण्णा सावंत, मारोती खंदारे, विनोद गोविंदवार, बंडू कणसे, लता काळदाते, दत्त्ता भदर्गे, विश्वनाथ कोरडे, सरस्वती कोरडे, मंजुळा जावळे, रुक्मिणी कोरडे, भिमराव मिसाळ, बाजीराव गायखै, शे. मुसा आदींचा सहभाग आहे.

टॅग्स :agitationआंदोलनgovernment schemeसरकारी योजनाRevenue Departmentमहसूल विभाग