शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

जालनेकरांनो, विचार करा अन् घरातच बसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 23:44 IST

इंग्रज राजवटीतील स्वातंत्र्य लढा असो किंवा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा असो; यात जालनेकरांनी दिलेल्या योगदानाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली

जालना : इंग्रज राजवटीतील स्वातंत्र्य लढा असो किंवा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा असो; यात जालनेकरांनी दिलेल्या योगदानाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक, औद्योगिक वारसाही मोठा लाभला आहे. प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी जालनेकर एकत्रित येतात, हे इतिहास सांगतो. मात्र, डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना विषाणूबाबत अनेक जालनेकर गंभीर का नाहीत, हाच प्रश्न आहे.जालनेकरांनो आपल्या सर्वांच्या सुदैवाने मंगळवारी २४ मार्च रोजी सायंकाळपर्यंत तरी कोरोनाची लागण झालेला एकही रूग्ण आढळून आलेला नाही. जालना जिल्ह्यात आजवर ५२ संशयित जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल झाले आहेत. पैकी ४२ जणांच्या स्वॅबचे अहवालही सुदैवाने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह अवघी प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहे. जनता कर्फ्यू पाळणा-या जालनेकरांनी सोमवारी कलम १४४ चे पालन न करता रस्त्यावरील रहदारी कायम ठेवली. राज्याची स्थिती अशीच असल्याने सोमवारी सायंकाळी संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, जालनेकरांची मंगळवारची सकाळ नेहमीप्रमाणेच वर्दळीने सुरू झाली. दुकाने बंद असली तरी रस्त्यावरील रहदारी कायम होती. जीवनावश्यक वस्तंूची खरेदी करताना एकच गर्दी आणि त्यातही सुरक्षात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात होते. कोरोना विषाणूमुळे चीन, इटली, जपान, स्पेन, अमेरिका अशा प्रगत राष्ट्रांचे कंबरडे मोडले आहे. त्या तुलनेत आपल्याकडे सोयी-सुविधांचा अभाव आहे. जालना जिल्ह्यात केवळ आणि केवळ २५ व्हेंटिलेटर आहेत. दुर्दैवाने कोरोनाचा फैलाव झाला आणि परिस्थिती बिकट झाली तर उपचारासाठी यंत्रणाही तोकडी पडणार आहे. त्यामुळे कोरोनाची लागणच होऊ नये, यासाठी शासन निर्देशानुसार जिल्हा प्रशासन अहोरात्र आवश्यक ती पावले उचलत आहे. त्यामुळे कोरोना विरूध्दच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेण्यासाठी आपण स्वत: शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत घरातच राहिलेले बरे. नागरिक रस्त्यावर उतरले तर पोलिसांना हातात दांडूका घेऊन उभे राहावे लागेल, गुन्हे दाखल करावी लागतील ? आणि ही बाब सर्वसामान्यांनाच परवडणारी नाही. कोरोनाचा लढा काही एक दोन माणसांसाठी नाही तर संबंध मानव जातीसाठी आहे. त्यामुळे कृपा करून जालनेकरांनी घराबाहेर पडू नये, गल्ली बोळातही एकत्रित येऊन गप्पा मारू नयेत, हीच अपेक्षा! शासनाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात झाला तर परिस्थिती काय होईल ? याचा विचार करा. चीन, इटली, स्पेन इ. देशांतील स्थितीचा विचार करा आणि घरात बसा अन्यथा मोजक्याच दिवसात जालन्याची अवस्था चीनमधील वुहान सारखी व्हायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की...!

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBharat Bandhभारत बंद