शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

जालनेकरांनो, विचार करा अन् घरातच बसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 23:44 IST

इंग्रज राजवटीतील स्वातंत्र्य लढा असो किंवा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा असो; यात जालनेकरांनी दिलेल्या योगदानाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली

जालना : इंग्रज राजवटीतील स्वातंत्र्य लढा असो किंवा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा असो; यात जालनेकरांनी दिलेल्या योगदानाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक, औद्योगिक वारसाही मोठा लाभला आहे. प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी जालनेकर एकत्रित येतात, हे इतिहास सांगतो. मात्र, डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना विषाणूबाबत अनेक जालनेकर गंभीर का नाहीत, हाच प्रश्न आहे.जालनेकरांनो आपल्या सर्वांच्या सुदैवाने मंगळवारी २४ मार्च रोजी सायंकाळपर्यंत तरी कोरोनाची लागण झालेला एकही रूग्ण आढळून आलेला नाही. जालना जिल्ह्यात आजवर ५२ संशयित जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल झाले आहेत. पैकी ४२ जणांच्या स्वॅबचे अहवालही सुदैवाने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह अवघी प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहे. जनता कर्फ्यू पाळणा-या जालनेकरांनी सोमवारी कलम १४४ चे पालन न करता रस्त्यावरील रहदारी कायम ठेवली. राज्याची स्थिती अशीच असल्याने सोमवारी सायंकाळी संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, जालनेकरांची मंगळवारची सकाळ नेहमीप्रमाणेच वर्दळीने सुरू झाली. दुकाने बंद असली तरी रस्त्यावरील रहदारी कायम होती. जीवनावश्यक वस्तंूची खरेदी करताना एकच गर्दी आणि त्यातही सुरक्षात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात होते. कोरोना विषाणूमुळे चीन, इटली, जपान, स्पेन, अमेरिका अशा प्रगत राष्ट्रांचे कंबरडे मोडले आहे. त्या तुलनेत आपल्याकडे सोयी-सुविधांचा अभाव आहे. जालना जिल्ह्यात केवळ आणि केवळ २५ व्हेंटिलेटर आहेत. दुर्दैवाने कोरोनाचा फैलाव झाला आणि परिस्थिती बिकट झाली तर उपचारासाठी यंत्रणाही तोकडी पडणार आहे. त्यामुळे कोरोनाची लागणच होऊ नये, यासाठी शासन निर्देशानुसार जिल्हा प्रशासन अहोरात्र आवश्यक ती पावले उचलत आहे. त्यामुळे कोरोना विरूध्दच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेण्यासाठी आपण स्वत: शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत घरातच राहिलेले बरे. नागरिक रस्त्यावर उतरले तर पोलिसांना हातात दांडूका घेऊन उभे राहावे लागेल, गुन्हे दाखल करावी लागतील ? आणि ही बाब सर्वसामान्यांनाच परवडणारी नाही. कोरोनाचा लढा काही एक दोन माणसांसाठी नाही तर संबंध मानव जातीसाठी आहे. त्यामुळे कृपा करून जालनेकरांनी घराबाहेर पडू नये, गल्ली बोळातही एकत्रित येऊन गप्पा मारू नयेत, हीच अपेक्षा! शासनाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात झाला तर परिस्थिती काय होईल ? याचा विचार करा. चीन, इटली, स्पेन इ. देशांतील स्थितीचा विचार करा आणि घरात बसा अन्यथा मोजक्याच दिवसात जालन्याची अवस्था चीनमधील वुहान सारखी व्हायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की...!

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBharat Bandhभारत बंद