शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:57 IST

येत्या आठवड्यापासून शहरातील जनतेला आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवीन जालना भागातील जलशुध्दीकरण केंद्राच्या दुुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. घाणेवाडी येथील जलाशयातील पाणी या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचले असून, येत्या आठवड्यापासून शहरातील जनतेला आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने घाणेवाडी जलाशय कोरडाठाक पडला होता. त्यामुळे नवीन जालना भागाला देखील जायकवाडी योजनेद्वारेच पाणी पुरवठा केला जात होता. परतीच्या पावसामुळे घाणेवाडी जलाशय तुडुंब भरला आहे. परंतु, वर्षभरापासून घाणेवाडीची जलवाहिनी बंद होती. त्यामुळे नवीन जालना भागाला पाणी पुरवठा करणारे जलशुध्दीकरण केंद्र देखील बंद पडले होते. या जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम जालना पालिकेतर्फे सुरु करण्यात आले असून, पाणी शुध्दीकरणासाठी लागणारा ब्लिचिंग पावडरचा साठा मागवण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी विद्यमान आ. कैलास गोरंट्याल यांनी शहराला आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. जलशुध्दीकरण केंद्राचे काम झाल्यानंतर दिलेल्या आश्वासनानुसार पुढील आठवड्यापासून आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालिकेने केले ४८ एमएलडी पाण्याचे नियोजनअंबड येथे जायकवाडी- जालना योजनेच्या कामादरम्यान तयार करण्यात आलेले २४ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र आणि त्याच ठिकाणी शहागड- जालना या योजनेदरम्यान कार्यान्वित करण्यात आलेले १५ एमएलडी क्षमतेच्या नादुरुस्त असलेल्या जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे.त्यामुळे या दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रांच्या माध्यमातून जालना शहराला पाणीटंचाईच्या कालावधीत एकूण ४८ एमएलडी पाणीपुरवठा करता येईल, असे नियोजन जालना पालिकेतर्फे करण्यात आले आहे. शहरातील जलशुध्दीकरण केंद्रांतर्गत ६ एमएलडी आणि अंबड येथील जलशुध्दीकरण केंद्रांतर्गत १८ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

टॅग्स :Waterपाणीnagaradhyakshaनगराध्यक्षJalana Muncipalityजालना नगरपरिषद