शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:57 IST

येत्या आठवड्यापासून शहरातील जनतेला आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवीन जालना भागातील जलशुध्दीकरण केंद्राच्या दुुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. घाणेवाडी येथील जलाशयातील पाणी या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचले असून, येत्या आठवड्यापासून शहरातील जनतेला आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने घाणेवाडी जलाशय कोरडाठाक पडला होता. त्यामुळे नवीन जालना भागाला देखील जायकवाडी योजनेद्वारेच पाणी पुरवठा केला जात होता. परतीच्या पावसामुळे घाणेवाडी जलाशय तुडुंब भरला आहे. परंतु, वर्षभरापासून घाणेवाडीची जलवाहिनी बंद होती. त्यामुळे नवीन जालना भागाला पाणी पुरवठा करणारे जलशुध्दीकरण केंद्र देखील बंद पडले होते. या जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम जालना पालिकेतर्फे सुरु करण्यात आले असून, पाणी शुध्दीकरणासाठी लागणारा ब्लिचिंग पावडरचा साठा मागवण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी विद्यमान आ. कैलास गोरंट्याल यांनी शहराला आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. जलशुध्दीकरण केंद्राचे काम झाल्यानंतर दिलेल्या आश्वासनानुसार पुढील आठवड्यापासून आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालिकेने केले ४८ एमएलडी पाण्याचे नियोजनअंबड येथे जायकवाडी- जालना योजनेच्या कामादरम्यान तयार करण्यात आलेले २४ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र आणि त्याच ठिकाणी शहागड- जालना या योजनेदरम्यान कार्यान्वित करण्यात आलेले १५ एमएलडी क्षमतेच्या नादुरुस्त असलेल्या जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे.त्यामुळे या दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रांच्या माध्यमातून जालना शहराला पाणीटंचाईच्या कालावधीत एकूण ४८ एमएलडी पाणीपुरवठा करता येईल, असे नियोजन जालना पालिकेतर्फे करण्यात आले आहे. शहरातील जलशुध्दीकरण केंद्रांतर्गत ६ एमएलडी आणि अंबड येथील जलशुध्दीकरण केंद्रांतर्गत १८ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

टॅग्स :Waterपाणीnagaradhyakshaनगराध्यक्षJalana Muncipalityजालना नगरपरिषद