शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'आता बॉम्ब टाकले तरी मागे हटणार नाही...'; मनोज जरांगे यांच्याशी थेट संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 08:36 IST

मनोज जरांगे पाटील यांची ‘लोकमत’ने घेतलेली एक्स्क्ल्युझिव मुलाखत.. 

- राम शिनगारे

अंतरवली सराटी (ता. अंबड, जि. जालना) : मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी गावात २८ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी पोलिसांनी उपोषणस्थळी केलेला गोळीबार व लाठीहल्ल्यामुळे आंदोलन चर्चेत आले आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची ‘लोकमत’ने घेतलेली एक्स्क्ल्युझिव मुलाखत.. 

प्रश्न :  पोलिसांनी गोळीबार केलाय का? उत्तर : ही बघा गोळी. (जवळील रिकामी बुलेट दाखवतात). आमच्याकडे काही बुलेटचा कारखाना नाही ?

प्रश्न :  आंदोलन किती दिवस चालणार? उत्तर : आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही. काल त्यांनी गोळीबार केला. आता बॉम्ब टाकले तरी मागे हटणार नाही. 

प्रश्न    प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन कशासाठी? उत्तर : आम्ही न्यायप्रविष्ट आरक्षणाचा विषय घेतलेलाच नाही. मराठवाड्यातल्या मराठ्यांना पूर्वी आरक्षण होतं, ते आरक्षण द्या, असं आम्ही म्हणतोय. जर हे न्यायप्रविष्ट असतं तर मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी समिती कशाला गठित केली? विदर्भाच्या अगोदर हैदराबाद संस्थानात होतं ते आरक्षण द्या, असं आमचं म्हणणं आहे.

प्रश्न   मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतरही आंदोलन सुरू का ठेवलं? उत्तर : त्यांनी फोन केला, की आता आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. मी आरक्षण देतो. त्यावर मी म्हणालो, साहेब तुमच्या समितीनं अहवालच दिलेला नाही. त्यावर असं असेल तर मी आत्ताच्या आत्ता समितीला बोलावतो आणि तुम्ही अहवाल केलाय का ते विचारतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते पुन्हा फोन करतो म्हणाले, एका तासात केला नाही आणि आता आमच्यावर थेट हल्लाच झाला.

प्रश्न  पोलिस म्हणतात, तुमची प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात नेणं गरजेचं होतं? उत्तर : आता काल तब्येत खालावली म्हटल्यावर मी आज तर बोलतोय. मी जर बोलू शकतो, तर तब्येत खालावली कोणाची? तरी मी एसपींना सांगितलं, की तुम्हाला काय ट्रीटमेंट करायची ती करा. तयार झाले, त्यांनी डॉक्टर आणले, माझ्या सगळ्या तपासण्याही केल्या. तब्येत चांगली राहण्यासाठी मला पाणीही प्यायला लावलं. तुम्ही उपचार घेतले, आम्ही खूश झालो आणि चाललो, असं म्हणाले. दोनशे मीटरवर गेले आणि एकाएकी ५०० पोलिसांचा ताफा आला आणि लोकांना मारायला लागला, याचं काय कारण?

प्रश्न   आंदोलन चिघळलं कसं?उत्तर : हे आंदोलन लाठीचार्जमुळे राज्य सरकारनं चिघळवलं. सरकारला मराठ्यांना काहीच द्यायचं नाही. म्हणून यांनी जाणूनबुजून हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला.  

टॅग्स :JalanaजालनाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार