शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चावडीवरील गप्पांत सर्वच विषयांवर होतेय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:13 IST

: सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हॉटेल, किराणा, पारावर, कट्ट्यावर, बसस्थानक, मंदिरात अशा सार्वजनिक ठिकाणी राजकीय चर्चा रंगत आहेत

राजू छल्लारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हॉटेल, किराणा, पारावर, कट्ट्यावर, बसस्थानक, मंदिरात अशा सार्वजनिक ठिकाणी राजकीय चर्चा रंगत आहेत. रस्त्यावरून येता-जाता ओळखीची व्यक्ती दिसली की, राजकीय विषयालाच हात घातला जात आहे.उन्हाचा पारा चढलेला असताना अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील एका दुकानासमोर मंगळवारी काही ग्रामस्थ राजकीय गप्पांमध्ये रमले. त्यातील पांडुरंग गावडे यांनी निवडणुकीच्या विषयाला हात घातला. त्यांनी शासनाच्या कर्जमाफी योजनेवर नाराजी व्यक्त केली. आजपर्यंत अनेक शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित आहेत. मोजक्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून, या कर्जमाफीबद्दल अजूनही खूप काही प्रश्न आहे.चर्चेला पुढे नेत राजेंद्र खटके म्हणाले, ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सामान्य माणसाला या रस्त्यावरून वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. अनेक नागरिकांना मणक्याचा, पाठीचा आजार जडला आहे. शासनाने प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता करणे आवश्यक आहे. तरच ख-या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो. चर्चा रंगत आली असताना सुरेश काळे म्हणाले की, शेतीमालाला हमीभाव देण्यात शासनाला अपयश आले आहे. शेतात जे मेहनतीने पिकवले जाते. त्याला बेभाव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे पिकांवर केलेला खर्च सुध्दा निघणे अवघड झाले असल्याचे ते म्हणाले. रंगनाथ चाबूकस्वार म्हणाले, शासनाने समाधानकारक काम केले आहे. शेतक-यांपर्यंत कशा प्रकारे योजना आणता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. शेतक-यांना विविध प्रकारच्या योजनांच्या लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली. त्यामुळे योजनेचा थेट फायदा हा तळागाळातील शेतक-यांना मिळाला आहे. हे या शासनाचे यशच म्हणावे लागेल.भारत उंडे म्हणाले, युतीचे शासन येणे आवश्यक आहे. यातून ख-या अर्थाने सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम शासनाने केले आहे. सरकारने रस्ते विकासाला महत्व दिले.दादाराव गायके यांनी सरकारचे समर्थन केले.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Rural Developmentग्रामीण विकासcivic issueनागरी समस्याPoliticsराजकारण