शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

चावडीवरील गप्पांत सर्वच विषयांवर होतेय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:13 IST

: सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हॉटेल, किराणा, पारावर, कट्ट्यावर, बसस्थानक, मंदिरात अशा सार्वजनिक ठिकाणी राजकीय चर्चा रंगत आहेत

राजू छल्लारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हॉटेल, किराणा, पारावर, कट्ट्यावर, बसस्थानक, मंदिरात अशा सार्वजनिक ठिकाणी राजकीय चर्चा रंगत आहेत. रस्त्यावरून येता-जाता ओळखीची व्यक्ती दिसली की, राजकीय विषयालाच हात घातला जात आहे.उन्हाचा पारा चढलेला असताना अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील एका दुकानासमोर मंगळवारी काही ग्रामस्थ राजकीय गप्पांमध्ये रमले. त्यातील पांडुरंग गावडे यांनी निवडणुकीच्या विषयाला हात घातला. त्यांनी शासनाच्या कर्जमाफी योजनेवर नाराजी व्यक्त केली. आजपर्यंत अनेक शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित आहेत. मोजक्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून, या कर्जमाफीबद्दल अजूनही खूप काही प्रश्न आहे.चर्चेला पुढे नेत राजेंद्र खटके म्हणाले, ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सामान्य माणसाला या रस्त्यावरून वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. अनेक नागरिकांना मणक्याचा, पाठीचा आजार जडला आहे. शासनाने प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता करणे आवश्यक आहे. तरच ख-या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो. चर्चा रंगत आली असताना सुरेश काळे म्हणाले की, शेतीमालाला हमीभाव देण्यात शासनाला अपयश आले आहे. शेतात जे मेहनतीने पिकवले जाते. त्याला बेभाव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे पिकांवर केलेला खर्च सुध्दा निघणे अवघड झाले असल्याचे ते म्हणाले. रंगनाथ चाबूकस्वार म्हणाले, शासनाने समाधानकारक काम केले आहे. शेतक-यांपर्यंत कशा प्रकारे योजना आणता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. शेतक-यांना विविध प्रकारच्या योजनांच्या लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली. त्यामुळे योजनेचा थेट फायदा हा तळागाळातील शेतक-यांना मिळाला आहे. हे या शासनाचे यशच म्हणावे लागेल.भारत उंडे म्हणाले, युतीचे शासन येणे आवश्यक आहे. यातून ख-या अर्थाने सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम शासनाने केले आहे. सरकारने रस्ते विकासाला महत्व दिले.दादाराव गायके यांनी सरकारचे समर्थन केले.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Rural Developmentग्रामीण विकासcivic issueनागरी समस्याPoliticsराजकारण