शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

भोकरदनवर अद्यापही पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:00 IST

भोकरदन तालुक्यात तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील नद्या, नाले कोरडेठाक असल्याने धरणात पाणीच आले नाही. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईचे संकट कायम आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील नद्या, नाले कोरडेठाक असल्याने धरणात पाणीच आले नाही. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईचे संकट कायम आहे़यावर्षी तालुक्यात पावसाळ््याच्या सुरूवातीलाच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकांची लागवड केली. त्यानंतर पिके चांगली बहरली. परंतु, पावसाने पंधरा ते वीस दिवस दडी मारल्याने पिके कोमात गेली होती. तर माळरानावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांनी लागवड केलेल्या मका, कापूस, सोयाबीन, मिरची या पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र अद्यापही तालुक्यातील पूर्णा, केळणा, जुई, धामणा, या प्रमुख नद्या वाहिल्या नाही. त्यामुळे तालुक्यातील जुई, धामणा, पद्मावती धरणामध्ये पाणीच आले नाही. धामण कोरडेठाक आहे, तर जुई धरण सुध्दा कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, तालुक्यात मोठा पाऊस न झाल्यास पाण्याची स्थिती अत्यंत बिकट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. तालुक्यात मोठ्या पावसाची नितांत गरज आहे़ भोकरदन शहरासह २५ गावांना पाणी पुरवठा करणाºया जुई धरणाने तळ गाठल्याने शहराला पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, तसेच परिसरातील २५ गावांना पाणी पुरवठा करणाºया विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई