शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

शेती समृध्दतेत पशुधनाशिवाय पर्याय नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 01:12 IST

शेती समृध्दीमध्ये पशुधनाला मोठे स्थान असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांसाठी पशुधन हा महत्त्वाचा घटक असून, शेती समृध्दीमध्ये पशुधनाला मोठे स्थान असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मथुरा येथे राष्ट्रीय पशुधन नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचा बुधवारी शुभारंभ झाला. हा कार्यक्रम तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात ‘लाईव्ह’ दाखविण्यात आला. यावेळी खोतकर बोलत होते.मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त, कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रीय सल्लागार डॉ. नितीन वाघ, सहायक पशुधन उपायुक्त डॉ. अमितकुमार दुबे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, पंडितराव भुतेकर, संतोष मोहिते, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्रीकृष्ण सोनुने, प्रा. विशाल यांची प्रमुख उपस्थिती होतीखोतकर म्हणाले, येत्या काळात एक हजार शेतकऱ्यांना दोन गायी, दोन म्हशी तसेच २० शेळ्या देण्याचा मानस आहे. शेतक-यांनी पशुधन वाढवत जावे आणि यातून आपली आर्थिक उन्नती साधावी. पोकरा ही शेतक-यांसाठी नवसंजीवनी आहे. येत्या काळात जनावरासाठी अ‍ॅम्बुलन्स सुद्धा उपलब्ध होणार आहे.श्रीकृष्ण सोनुने यांनी प्रास्ताविक केले. शेतक-यांच्या दृष्टीकोनातून आज होत असलेला कार्यक्रम भारतातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. दिवसेंदिवस पशुधन कमी होत आहे. ते वाढविणे गरजेचे असून, लसीकरणाचे महत्त्व कार्यक्रमातून लक्षात येणार आहेडॉ. जगदीश बुक्तारे यांनी जनावरांना होणा-या लाळ्या, खुरकुत या रोगाची लक्षणे सांगून लसीकरणाचे महत्त्व विशद केले. तर डॉ. नितीन वाघ यांनी ब्रूसेकोसी मुळे जनावरांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शेतक-यांची मोठी आर्थिक हानी होते. यासाठी चार ते आठ वेळा लसीकरण करावे, असे आवाहन केले. डॉ. अमितकुमार दुबे यांनी कृत्रिम रेतनाविषयी सविस्तर माहिती दिली. कृषी उपसंचालक विजय माईनकर यांनी कृषी विभागाच्या असलेल्या विविध योजना शेतक-यांना सांगितल्या. सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ डॉक्टर हनुमंत आगे यांनी केले.कृषिरत्न विजयअण्णा बोराडे म्हणाले, शेतक-यांनी जनावरांची विशेष काळजी घेतली पाहिजे. सदैव जनावरे सुदृढ ठेवायची असतील तर लसीकरण महत्त्वाचे आहे.जमेल त्या जनावराचा शेतक-यांनी वापर केलाच पाहिजे. जनावरांना होणा-या विविध रोगांविषयी जागरुक असले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रArjun Khotkarअर्जुन खोतकरFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना