शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

शेती समृध्दतेत पशुधनाशिवाय पर्याय नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 01:12 IST

शेती समृध्दीमध्ये पशुधनाला मोठे स्थान असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांसाठी पशुधन हा महत्त्वाचा घटक असून, शेती समृध्दीमध्ये पशुधनाला मोठे स्थान असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मथुरा येथे राष्ट्रीय पशुधन नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचा बुधवारी शुभारंभ झाला. हा कार्यक्रम तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात ‘लाईव्ह’ दाखविण्यात आला. यावेळी खोतकर बोलत होते.मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त, कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रीय सल्लागार डॉ. नितीन वाघ, सहायक पशुधन उपायुक्त डॉ. अमितकुमार दुबे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, पंडितराव भुतेकर, संतोष मोहिते, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्रीकृष्ण सोनुने, प्रा. विशाल यांची प्रमुख उपस्थिती होतीखोतकर म्हणाले, येत्या काळात एक हजार शेतकऱ्यांना दोन गायी, दोन म्हशी तसेच २० शेळ्या देण्याचा मानस आहे. शेतक-यांनी पशुधन वाढवत जावे आणि यातून आपली आर्थिक उन्नती साधावी. पोकरा ही शेतक-यांसाठी नवसंजीवनी आहे. येत्या काळात जनावरासाठी अ‍ॅम्बुलन्स सुद्धा उपलब्ध होणार आहे.श्रीकृष्ण सोनुने यांनी प्रास्ताविक केले. शेतक-यांच्या दृष्टीकोनातून आज होत असलेला कार्यक्रम भारतातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. दिवसेंदिवस पशुधन कमी होत आहे. ते वाढविणे गरजेचे असून, लसीकरणाचे महत्त्व कार्यक्रमातून लक्षात येणार आहेडॉ. जगदीश बुक्तारे यांनी जनावरांना होणा-या लाळ्या, खुरकुत या रोगाची लक्षणे सांगून लसीकरणाचे महत्त्व विशद केले. तर डॉ. नितीन वाघ यांनी ब्रूसेकोसी मुळे जनावरांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शेतक-यांची मोठी आर्थिक हानी होते. यासाठी चार ते आठ वेळा लसीकरण करावे, असे आवाहन केले. डॉ. अमितकुमार दुबे यांनी कृत्रिम रेतनाविषयी सविस्तर माहिती दिली. कृषी उपसंचालक विजय माईनकर यांनी कृषी विभागाच्या असलेल्या विविध योजना शेतक-यांना सांगितल्या. सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ डॉक्टर हनुमंत आगे यांनी केले.कृषिरत्न विजयअण्णा बोराडे म्हणाले, शेतक-यांनी जनावरांची विशेष काळजी घेतली पाहिजे. सदैव जनावरे सुदृढ ठेवायची असतील तर लसीकरण महत्त्वाचे आहे.जमेल त्या जनावराचा शेतक-यांनी वापर केलाच पाहिजे. जनावरांना होणा-या विविध रोगांविषयी जागरुक असले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रArjun Khotkarअर्जुन खोतकरFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना