शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

शेती समृध्दतेत पशुधनाशिवाय पर्याय नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 01:12 IST

शेती समृध्दीमध्ये पशुधनाला मोठे स्थान असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांसाठी पशुधन हा महत्त्वाचा घटक असून, शेती समृध्दीमध्ये पशुधनाला मोठे स्थान असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मथुरा येथे राष्ट्रीय पशुधन नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचा बुधवारी शुभारंभ झाला. हा कार्यक्रम तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात ‘लाईव्ह’ दाखविण्यात आला. यावेळी खोतकर बोलत होते.मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त, कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रीय सल्लागार डॉ. नितीन वाघ, सहायक पशुधन उपायुक्त डॉ. अमितकुमार दुबे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, पंडितराव भुतेकर, संतोष मोहिते, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्रीकृष्ण सोनुने, प्रा. विशाल यांची प्रमुख उपस्थिती होतीखोतकर म्हणाले, येत्या काळात एक हजार शेतकऱ्यांना दोन गायी, दोन म्हशी तसेच २० शेळ्या देण्याचा मानस आहे. शेतक-यांनी पशुधन वाढवत जावे आणि यातून आपली आर्थिक उन्नती साधावी. पोकरा ही शेतक-यांसाठी नवसंजीवनी आहे. येत्या काळात जनावरासाठी अ‍ॅम्बुलन्स सुद्धा उपलब्ध होणार आहे.श्रीकृष्ण सोनुने यांनी प्रास्ताविक केले. शेतक-यांच्या दृष्टीकोनातून आज होत असलेला कार्यक्रम भारतातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. दिवसेंदिवस पशुधन कमी होत आहे. ते वाढविणे गरजेचे असून, लसीकरणाचे महत्त्व कार्यक्रमातून लक्षात येणार आहेडॉ. जगदीश बुक्तारे यांनी जनावरांना होणा-या लाळ्या, खुरकुत या रोगाची लक्षणे सांगून लसीकरणाचे महत्त्व विशद केले. तर डॉ. नितीन वाघ यांनी ब्रूसेकोसी मुळे जनावरांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शेतक-यांची मोठी आर्थिक हानी होते. यासाठी चार ते आठ वेळा लसीकरण करावे, असे आवाहन केले. डॉ. अमितकुमार दुबे यांनी कृत्रिम रेतनाविषयी सविस्तर माहिती दिली. कृषी उपसंचालक विजय माईनकर यांनी कृषी विभागाच्या असलेल्या विविध योजना शेतक-यांना सांगितल्या. सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ डॉक्टर हनुमंत आगे यांनी केले.कृषिरत्न विजयअण्णा बोराडे म्हणाले, शेतक-यांनी जनावरांची विशेष काळजी घेतली पाहिजे. सदैव जनावरे सुदृढ ठेवायची असतील तर लसीकरण महत्त्वाचे आहे.जमेल त्या जनावराचा शेतक-यांनी वापर केलाच पाहिजे. जनावरांना होणा-या विविध रोगांविषयी जागरुक असले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रArjun Khotkarअर्जुन खोतकरFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना