शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

चूक उमगलेले परतीच्या मार्गावर, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाही: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 19:55 IST

आता चूक उमगलेले कार्यकर्ते परत राष्ट्रवादीत येत आहेत.

जालना : राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतरही राज्यातील जनतेने शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येणे शक्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. पाटील यांनी गुरुवारी जालन्यातील मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ता संवाद मेळावे घेतले जात आहेत. त्यापुढे आम्ही शिवसंवाद यात्रा दोन काढून जनतेशी संवाद साधणार आहोत. आता चूक उमगलेले कार्यकर्ते परत राष्ट्रवादीत येत आहेत. भाजपचे नेते, कार्यकर्ते येत आहेत. दोन वेगळे पक्ष झाले. जनतेने शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. आजही नैतिकतेला महत्त्व देणारी लोक आहेत. त्यामुळे असे लोक असेपर्यंत चिंता नाही, असेही पाटील म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढविणार असून, आमच्यात चर्चा झाल्याशिवाय राष्ट्रवादीला किती जागा मिळतील हे आज सांगता येणार नाही. परंतु, महाविकास आघाडीच्या १७५ हून अधिक जागा येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दोन्ही आंदोलकांना सरकारनेच आश्वासन दिलेशरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याबद्दल माहिती नाही. मराठा आरक्षणावर आम्ही आमची भूमिका पूर्वीच मांडली आहे. विरोधकांना विकास कामांवेळी विश्वासात घेतलं जात नाही. निधी वाटपावेळी विश्वासात घेतलं जात नाही. त्यात आता मराठा आंदोलक, ओबीसी आंदोलकांशी शासनाने चर्चा करून आश्वासन दिलं आहे. समाजाशी चर्चा करताना, आश्वासन देण्यापूर्वी विरोधकांना विश्वासात घेणे अपेक्षित होतं. सरकारने जे आश्वासन दिले त्यावर निर्णय घेण्याची वेळ आली असून, तो निर्णय वेळेत घ्यावा, असे पाटील म्हणाले.

मोठ्या नेत्यांनी आव्हान; प्रतिआव्हानांपासून दूर रहावेएखाद्यावर आरोप केल्यानंतर त्याला त्यातून सोडविण्याचे आश्वासन देणे हे अतिशय गंभीर आहे. त्यात आता अनिल देशमुख यांच्यावर कोणत्या तरी अधिकाऱ्याला बोलून आरोप करायला लावले जात आहेत. या जुन्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा, विरोधी पक्षाची माप काढण्यापेक्षा आम्ही विकास कसा करणार, पुढे काय करणार हे सरकारने जनतेला सांगावे. राजकारणात आव्हान आणि प्रति आव्हानांपासून मोठ्या नेत्यांनी दूर रहावे, असा सल्ला पाटील यांनी फडणवीस यांना दिला.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalanaजालना