शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

चूक उमगलेले परतीच्या मार्गावर, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाही: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 19:55 IST

आता चूक उमगलेले कार्यकर्ते परत राष्ट्रवादीत येत आहेत.

जालना : राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतरही राज्यातील जनतेने शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येणे शक्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. पाटील यांनी गुरुवारी जालन्यातील मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ता संवाद मेळावे घेतले जात आहेत. त्यापुढे आम्ही शिवसंवाद यात्रा दोन काढून जनतेशी संवाद साधणार आहोत. आता चूक उमगलेले कार्यकर्ते परत राष्ट्रवादीत येत आहेत. भाजपचे नेते, कार्यकर्ते येत आहेत. दोन वेगळे पक्ष झाले. जनतेने शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. आजही नैतिकतेला महत्त्व देणारी लोक आहेत. त्यामुळे असे लोक असेपर्यंत चिंता नाही, असेही पाटील म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढविणार असून, आमच्यात चर्चा झाल्याशिवाय राष्ट्रवादीला किती जागा मिळतील हे आज सांगता येणार नाही. परंतु, महाविकास आघाडीच्या १७५ हून अधिक जागा येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दोन्ही आंदोलकांना सरकारनेच आश्वासन दिलेशरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याबद्दल माहिती नाही. मराठा आरक्षणावर आम्ही आमची भूमिका पूर्वीच मांडली आहे. विरोधकांना विकास कामांवेळी विश्वासात घेतलं जात नाही. निधी वाटपावेळी विश्वासात घेतलं जात नाही. त्यात आता मराठा आंदोलक, ओबीसी आंदोलकांशी शासनाने चर्चा करून आश्वासन दिलं आहे. समाजाशी चर्चा करताना, आश्वासन देण्यापूर्वी विरोधकांना विश्वासात घेणे अपेक्षित होतं. सरकारने जे आश्वासन दिले त्यावर निर्णय घेण्याची वेळ आली असून, तो निर्णय वेळेत घ्यावा, असे पाटील म्हणाले.

मोठ्या नेत्यांनी आव्हान; प्रतिआव्हानांपासून दूर रहावेएखाद्यावर आरोप केल्यानंतर त्याला त्यातून सोडविण्याचे आश्वासन देणे हे अतिशय गंभीर आहे. त्यात आता अनिल देशमुख यांच्यावर कोणत्या तरी अधिकाऱ्याला बोलून आरोप करायला लावले जात आहेत. या जुन्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा, विरोधी पक्षाची माप काढण्यापेक्षा आम्ही विकास कसा करणार, पुढे काय करणार हे सरकारने जनतेला सांगावे. राजकारणात आव्हान आणि प्रति आव्हानांपासून मोठ्या नेत्यांनी दूर रहावे, असा सल्ला पाटील यांनी फडणवीस यांना दिला.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalanaजालना