शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

महिलांनी हंडा मोर्चातून भोकरदन नगरपालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By शिवाजी कदम | Updated: December 18, 2023 19:19 IST

भोकरदन शहरावर पाणी टंचाईचे संकट, चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी

भोकरदन: अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये पाणी टंचाईचे संकट गहरे झाले आहे. भोकरदन शहरात तीव्र पाणी टंचाई सुरू असल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. चार दिवस आड शहरात पाणीपुरवठा करा या मुख्य मागणीसाठी कॉंग्रेस कमिटीकडून नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. हंडा मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

मोर्चाच्याची सुरूवात नवे भोकरदन येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, शाहीर आण्णाभाऊ साठे, टिपु सुलतान, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा नगरपालिका कार्यालयासमोर पोहचला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी एजाज पठाण, राहुल देशमुख, वंदना हजारे, बंटी औटी, त्रिंबकराव पाबळे यांची मार्गदर्शन केले. यानंतर नगरपालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले.

खडकपूर्णा योजनेतून आलेले पाणी तात्काळ शहराला पुरविणे, शहरातील हातपंप दुरूस्ती, नवीन कूपनलिका, घरकुल लाभार्थ्यांची देयके, शहरातील स्वच्छता या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदनावर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, तालुकाध्यक्ष त्रिबंकराव पाबळे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, भाऊसाहेब सोळुंके, श्रावण आक्से, चंद्रकांत पगारे, एजाज पठाण, संतोष अन्नदाते, रिझवान शेख, महेश दसपुते, गणेश आक्से, साळुबा लोखंडे, रफिक पानवाले, दादाराव देशमुख, सोपान सपकाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मोर्चा यशस्वीतेसाठी अनिता गायकवाड, लक्ष्मीबाई लाहुरीकर, संगीता सुरडकर, सुनिता शिंगारे, संगीता फुसे, ललिता पारख, निर्मला आक्से, अंजना बारोकर, पंजाब देशमुख, वंदना हजारे, महेश औटी, रोषण देशमुख यांनी प्रयत्न केले.

शहरात कृत्रिम पाणी टंचाईमहिनाभरापासून खडकपूर्णा धरणातून पाणी आलेले आहे. केवळ सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे व प्रशासकाच्या दुर्लक्षाने भोकरदन शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. येत्या पंधरा दिवसांत शहराला चार दिवसा-आड पाणी पुरवठा केला नाही, तर आम्ही धरणे आंदोलने करु. या परिस्थितीला नगरपालिकेचे प्रशासक जबाबदार राहतील.- राजाभाऊ देशमुख, जिल्हाध्यक्ष,कॉंग्रेस.

टॅग्स :Jalanaजालनाagitationआंदोलन