शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

महिलांनी हंडा मोर्चातून भोकरदन नगरपालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By शिवाजी कदम | Updated: December 18, 2023 19:19 IST

भोकरदन शहरावर पाणी टंचाईचे संकट, चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी

भोकरदन: अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये पाणी टंचाईचे संकट गहरे झाले आहे. भोकरदन शहरात तीव्र पाणी टंचाई सुरू असल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. चार दिवस आड शहरात पाणीपुरवठा करा या मुख्य मागणीसाठी कॉंग्रेस कमिटीकडून नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. हंडा मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

मोर्चाच्याची सुरूवात नवे भोकरदन येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, शाहीर आण्णाभाऊ साठे, टिपु सुलतान, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा नगरपालिका कार्यालयासमोर पोहचला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी एजाज पठाण, राहुल देशमुख, वंदना हजारे, बंटी औटी, त्रिंबकराव पाबळे यांची मार्गदर्शन केले. यानंतर नगरपालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले.

खडकपूर्णा योजनेतून आलेले पाणी तात्काळ शहराला पुरविणे, शहरातील हातपंप दुरूस्ती, नवीन कूपनलिका, घरकुल लाभार्थ्यांची देयके, शहरातील स्वच्छता या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदनावर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, तालुकाध्यक्ष त्रिबंकराव पाबळे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, भाऊसाहेब सोळुंके, श्रावण आक्से, चंद्रकांत पगारे, एजाज पठाण, संतोष अन्नदाते, रिझवान शेख, महेश दसपुते, गणेश आक्से, साळुबा लोखंडे, रफिक पानवाले, दादाराव देशमुख, सोपान सपकाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मोर्चा यशस्वीतेसाठी अनिता गायकवाड, लक्ष्मीबाई लाहुरीकर, संगीता सुरडकर, सुनिता शिंगारे, संगीता फुसे, ललिता पारख, निर्मला आक्से, अंजना बारोकर, पंजाब देशमुख, वंदना हजारे, महेश औटी, रोषण देशमुख यांनी प्रयत्न केले.

शहरात कृत्रिम पाणी टंचाईमहिनाभरापासून खडकपूर्णा धरणातून पाणी आलेले आहे. केवळ सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे व प्रशासकाच्या दुर्लक्षाने भोकरदन शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. येत्या पंधरा दिवसांत शहराला चार दिवसा-आड पाणी पुरवठा केला नाही, तर आम्ही धरणे आंदोलने करु. या परिस्थितीला नगरपालिकेचे प्रशासक जबाबदार राहतील.- राजाभाऊ देशमुख, जिल्हाध्यक्ष,कॉंग्रेस.

टॅग्स :Jalanaजालनाagitationआंदोलन