शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मराठवाड्यातील मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय वेगळा; मनोज जरांगे यांनी केला उलगडा

By विजय मुंडे  | Updated: September 4, 2023 16:49 IST

सुप्रिम कोर्टातील आरक्षणाचा विषय नाही, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी : मनोज जरांगे

जालना / वडीगोद्री : सुप्रिम कोर्टातील आरक्षणाविषयीची आमची मागणी नाही. सुप्रिम कोर्टात गायकवाड आयोगाने दिलेले आरक्षण आहे. मराठा समाजाचा शेती हा मूळ व्यवसाय आहे. त्यामुळे मराठवाड्यासह अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे, ५० टक्क्याच्या आतील आरक्षण द्यावे अशी मागणी आहे. तसे पुरावे शासनाच्या हाती लागले असून, शासनाकडून त्याबाबतचा जीआर आज निघेल, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्यात सोमवारी सकाळी झालेल्या चर्चेदरम्यान कोणता संवाद झाला याबाबतची माहिती देण्यासाठी ते माध्यमांशी बोलत होते. मराठवाडा हा एक वर्षानंतर अखंड महाराष्ट्रात सहभागी झाला. आम्ही हैद्राबाद संस्थानमध्ये असताना आरक्षण होते. आम्हाला ते आरक्षण लागू केलं नाही. राज ठाकरे यांनी आरक्षण मिळणार नाही. राजकीय मंडळी झुलवित ठेवणार आहेत, अशी भूमिका मांडली. परंतु, ते जे बोलत होते ते सुप्रिम कोर्टातील आरक्षणाच्या विषयावर बोलत होते. तो विषय आमचा नाही. आमच्यातील चर्चेदरम्यान राज ठाकरे यांच्या लक्षात आमची मागणी आली आहे.

आज शासनाने जी समिती सदस्यांची बैठक घेतली त्यात जालना जिल्ह्यातील काही तालुक्यात मराठा कुणबी हे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे काल गिरीश महाजन जसे म्हणाले होते की आम्हाला जीआर काढण्यासाठी आधार पाहिजे. आता शासनाला आधार मिळाला आहे. त्यामुळे आता अखंड महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतचा जीआर शासन काढेल, असा आमचा विश्वास आहे. राज ठाकरे यांनाही ही बाब पटली असून, तज्ज्ञांचा सल्ला घेवून, अभ्यास करून ते या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. आम्ही मराठा आरक्षणासाठी जो मुद्दा सांगितला होता, त्यावर राज ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना