शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
6
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
7
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
10
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
11
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
12
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
13
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
14
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
15
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
16
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
17
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
18
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
19
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
20
"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 11:35 IST

मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे मोर्चा; जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

- पवन पवारवडीगोद्री (जालना) : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने नेमलेल्या उपसमितीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने मराठा समाजाला 'येड्यात काढू नये', असे सुनावत, ही समिती म्हणजे 'जुनेच खुळ' असून 'फक्त खांदे बदलले पोळ्याच्या दिवशी', असा टोला त्यांनी लगावला आहे.

अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली. 'आमचं म्हणणं सरकारच्या डोक्यात येत नाही, सरकार किडे पडल्यासारखं वागायला लागलं आहे,' असा संताप त्यांनी व्यक्त केला.

'या' मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी कराजरांगे पाटील यांनी सरकारने तातडीने काही महत्त्वाच्या मागण्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी केली.- मराठा-कुणबी एक आहे, असा जीआर काढावा.- यासाठी तातडीने कॅबिनेट बैठका घ्या.- केसेस मागे घ्या आणि शहीद झालेल्या कुटुंबांना मदत द्या.- 'सगे सोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी करा.- हैदराबाद व सातारा संस्थानांच्या गॅझेटसाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलवा.

मुंबईकडे मोर्चा काढण्याचा इशारासरकारने जर आमच्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर आम्ही मुंबईला येऊ, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. 'तुम्ही दिशाभूल करणारे काम करू नका, मराठ्यांना येड्यात काढायचे बंद करा,' असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

उपसमिती जुनीचजरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, उपसमिती स्थापन करणे आणि त्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 'उपसमिती तर पूर्वीच होती, फक्त आता दुसरे कोणीतरी अध्यक्ष झाले आहे,याला आमच्याकडे खांदे बदल म्हणतात' असे म्हणत त्यांनी सरकारची कृती निव्वळ पोकळ असल्याचे सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना