शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

"सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करतंय"; मनोज जरांगेचं पुन्हा 'आमरण उपोषणास्त्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 11:45 IST

सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. पण...

आजपासून पुन्हा एकदा आपण आमरण उपोषण सुरू करत आहोत. गेल्या २९ ऑगस्टला आमरण उपोषण सुरू झाले. यानंतर, १४ तारखेला तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देऊ, मात्र ते कायद्यात टिकायला हवे. यासाठी एक महिन्याची वेळ द्या. असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांनी शब्द दिला होता आणि आपले उपोषण सोडवले होते. सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. मात्र सरकारने यावर कसल्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने आपण स्थगित केलेल्या आमरण आणि साखळी उपोषणाचे रुपांतर पुन्हा एकदा आमरण उपोषणात करत आहोत. असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तसेच, यापूर्वीही १७ दिवसांचे आमरण उपोषण केले होते. मात्र, या आमरण उपोषणात आपण अन्न-पाणी आणि कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार घेणार नाही, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.

३० ऐवजी ४० दिवसांचा वेळ दिला होता, पण...मनोज जरांगे म्हणाले, या गोर गरीब लेकरांसाठी आपण आजपासून पुन्हा एकदा ताकदीने कठोर आमरण उपोषण सुरू करणार आहोत. कारण सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा मान सन्मान ठेऊन आपण त्यांना ३० ऐवजी ४० दिवसांचा वेळ दिला होता. मात्र, आमच्या गोर गरिबांच्या वेदना लक्षात घेऊन कुणाकडूनही अद्याप आरक्षण देण्यात आलेले नाही. आम्हाला कालपर्यंत आशा होती, की सरकार आम्हाला आमच्या हक्काचं, ५० टक्क्यांच्या आतमधील ओबीसी आरक्षण मिळेल आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश होईल, अशी आम्हाला आशा होती. मात्र तसे झाले नाही. यामुळे हे उपोषण पुन्हा सुरू केले आहे.

सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे -मराठा समाजाच्या आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र चाळीस दिवस होऊनही ते मागे घेतलेले नाहीत.म्हणजेच सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा याचा अर्थ आहे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

आमचा बांधव आमच्यातून गेला याला सरकार जबाबदार -मराठा समाजाच्या आरक्षणासाठी १६-१७ हून अधिक बांधवांनी आत्महत्या केल्या, मात्र संभाजीनगर वगळता, इतरांसाठी मद देण्यासंदर्भात सरकारने पाऊल उचललेले नाही. आमचा बांधव आमच्यातून गेला याला सरकार जबाबदार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आमचा भाऊ आमच्यातून गेला नसता, असेही जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणGovernmentसरकार