शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करतंय"; मनोज जरांगेचं पुन्हा 'आमरण उपोषणास्त्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 11:45 IST

सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. पण...

आजपासून पुन्हा एकदा आपण आमरण उपोषण सुरू करत आहोत. गेल्या २९ ऑगस्टला आमरण उपोषण सुरू झाले. यानंतर, १४ तारखेला तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देऊ, मात्र ते कायद्यात टिकायला हवे. यासाठी एक महिन्याची वेळ द्या. असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांनी शब्द दिला होता आणि आपले उपोषण सोडवले होते. सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. मात्र सरकारने यावर कसल्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने आपण स्थगित केलेल्या आमरण आणि साखळी उपोषणाचे रुपांतर पुन्हा एकदा आमरण उपोषणात करत आहोत. असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तसेच, यापूर्वीही १७ दिवसांचे आमरण उपोषण केले होते. मात्र, या आमरण उपोषणात आपण अन्न-पाणी आणि कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार घेणार नाही, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.

३० ऐवजी ४० दिवसांचा वेळ दिला होता, पण...मनोज जरांगे म्हणाले, या गोर गरीब लेकरांसाठी आपण आजपासून पुन्हा एकदा ताकदीने कठोर आमरण उपोषण सुरू करणार आहोत. कारण सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा मान सन्मान ठेऊन आपण त्यांना ३० ऐवजी ४० दिवसांचा वेळ दिला होता. मात्र, आमच्या गोर गरिबांच्या वेदना लक्षात घेऊन कुणाकडूनही अद्याप आरक्षण देण्यात आलेले नाही. आम्हाला कालपर्यंत आशा होती, की सरकार आम्हाला आमच्या हक्काचं, ५० टक्क्यांच्या आतमधील ओबीसी आरक्षण मिळेल आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश होईल, अशी आम्हाला आशा होती. मात्र तसे झाले नाही. यामुळे हे उपोषण पुन्हा सुरू केले आहे.

सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे -मराठा समाजाच्या आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र चाळीस दिवस होऊनही ते मागे घेतलेले नाहीत.म्हणजेच सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा याचा अर्थ आहे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

आमचा बांधव आमच्यातून गेला याला सरकार जबाबदार -मराठा समाजाच्या आरक्षणासाठी १६-१७ हून अधिक बांधवांनी आत्महत्या केल्या, मात्र संभाजीनगर वगळता, इतरांसाठी मद देण्यासंदर्भात सरकारने पाऊल उचललेले नाही. आमचा बांधव आमच्यातून गेला याला सरकार जबाबदार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आमचा भाऊ आमच्यातून गेला नसता, असेही जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणGovernmentसरकार