शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:55 IST

जालन्यातील वरुडमध्ये शेतातील दुःखद घटना; पित्याबरोबर दोन्ही लेकरांचा मृत्यू

जालना: जालना तालुक्यातील वरुड शिवारात आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शेतात मल्चिंग पन्नी बसवत असताना विद्युत प्रवाहाचा धक्का बसून वडील विनोद तुकाराम मस्के (वय ३५) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मदतीला धावून आलेल्या दोन निष्पाप चिमुकल्यांचा श्रद्धा मस्के (वय ११) आणि समर्थ मस्के (वय ८) या दोघांचा देखील विद्युत प्रवाहाचा जबर धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला.

वडिलांसाठी दोन्ही मुले पाणी घेऊन आली होती. मात्र, वडिलांच्या स्पर्शात असलेल्या विजेच्या प्रवाहाने त्यांनाही झटकले. काही क्षणातच दोन्ही मुलं वडिलांच्या अंगावर कोसळली आणि तिथेच तिघांचा जीव गेला. काही वेळानंतर मुले घरी परतली नाहीत म्हणून आई शेताकडे आली. समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जामीन सरकली. नवऱ्याचा आणि दोन्ही मुलांचा मृतदेह पाहून तीने हंबरडा फोडताच आवाज ऐकून शेजारील शेतकरी धावत आले, मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र