शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मद्यपी मुलासोबत टोकाचे भांडण झालं, संतापलेल्या वडिलांनी गळा आवळून केला खून

By विजय मुंडे  | Updated: May 5, 2023 14:36 IST

गळफास घेतल्याचा बनाव उघडकीस; शवविच्छेदन करताना मृतदेहावर जखमा आढळून आल्याने उघडकीस आला खून

धावडा (जि. जालना) : दारूच्या आहारी गेलेल्या मुलासोबत झालेल्या भांडणात वडिलांनीच त्याचा गळा अवळून खून केला. त्यानंतर वडिलांनी मुलाने गळफास घेतल्याचा बनाव केला. ही घटना विझोरा (ता. भोकरदन) येथे बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात मयत मुलाच्या वडिलांविरुद्ध गुरुवारी पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य गजानन आढाव (वय २१), असे मयत युवकाचे नाव आहे. आदित्य गजानन आढाव याने बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर गणेश पंडित गावंडे यांनी पारध पोलिस ठाण्यात दिली होती. प्रारंभी, या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती; परंतु धावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पार्थिव आणले. डॉ. प्राजक्ता ताठे, डॉ. महेश गायकवाड, सपोनि अभिजित मोरे यांना मयताच्या पार्थिवावर जखमा दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर वडिलांनीच त्याचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले. 

मयत आदित्य याला दारूचे व्यसन होते. यातूनच बुधवारी रात्री आदित्य आणि त्याचे वडील गजानन येडुबा आढाव यांच्यात भांडण झाले. त्यावेळी गजानन आढाव यांनी आदित्यचा गळा आवळून खून केल्याची तक्रार मयताची आई संगीता आढाव यांनी पारध पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार गजानन आढाव यांच्याविरुद्ध गुरुवारी सायंकाळी पारध पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि ए.एस. मोरे करीत आहेत. मयताच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी